शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:26 IST

Last Railway Station Of India: भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे.

Last Railway Station Of India:  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतात रेल्वेचाच जास्त वापर केला जातो. कारण याने प्रवास सुखकर आणि स्वस्त असतो. तुम्हीही अनेकदा प्रवास केला असेल आणि अनेक स्टेशन फिरले असाल. पण कधीतरी तुमच्या मनात हा विचार आला असेलच की, असं एखादं रेल्वे स्टेशन असेल ज्याला देशातील शेवटचं स्टेशन म्हणता येईल. 

तर भारतात असं एक शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. ज्यातील एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात जोगबनी येथे आहे. या स्टेशनला देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. इथून नेपाळमध्ये पायी जाता येतं. त्याशिवाय पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशनही भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. या स्टेशनवरील प्रत्येक गोष्ट इंग्रजांच्या काळातील आहे.

भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे. जे बांग्लादेशच्या सीमेजवळ आहे. बांग्लादेशच्या जवळ असल्याने इथून तिकडे पायी जाता येतं.भारताची फाळणी झाल्यानंतर या स्टेशनच्या मेंटनन्सचं काम जसंच्या तसं थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे इथून कोणतीही गाडी जात नव्हती. पण 1978 मध्ये जेव्हा मालगाड्या सुरू झाल्या तेव्हा पुन्हा रेल्वे आणि हार्नचा आवाज येऊ लागला. या गाड्या आधी बांग्लादेशपर्यंत जात होत्या. पण 2011 मध्ये शेजारी नेपाळपर्यंतही जात होत्या.

भलेही इथून गाड्यांची ये-जा सुरू झाली असेल, पण या स्टेशनच्या रंग-रूपात काहीच बदल झाला नाही. हे स्टेशन आजही जसंच्या तसंच आहे, जसं इंग्रज सोडून गेले होते. इथून मालगाडीशिवाय दोन मैत्री एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वेही जातात.

या स्टेशनचा वापर कोलकाता आणि ढाका दरम्यान रेल्वे कनेक्टिविटीसाठी केला जात होता. पण ही रेल्वे स्वातंत्र्य आधीची आहे. त्यामुळे ढाका येथे जाण्यासाठी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांनी अनेकदा या मार्गाचा वापर केला होता. कधीकाळी इथून दार्जिलिंग मेल सारख्या गाड्याही जात होत्या. पण आता इथून केवळ मालगाड्या जातात.

या स्टेशनवर आजही जुन्या काळातील हाताच्या गिअरच्या सिग्नचा वापर केला जातो. सोबतच इथे जास्त रेल्वे कर्मचारीही ठेवले जात नाहीत.इतकंच नाही तर टिकीट काउंटरही बंद झालं आहे. जास्त कर्मचारी नसतात कारण जेव्हा मालगाडी जाते तेव्हा फक्त सिग्नल द्यायचा असतो. जी रोहनपूर मार्गे बांग्लादेशला जाते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके