शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:26 IST

Last Railway Station Of India: भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे.

Last Railway Station Of India:  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतात रेल्वेचाच जास्त वापर केला जातो. कारण याने प्रवास सुखकर आणि स्वस्त असतो. तुम्हीही अनेकदा प्रवास केला असेल आणि अनेक स्टेशन फिरले असाल. पण कधीतरी तुमच्या मनात हा विचार आला असेलच की, असं एखादं रेल्वे स्टेशन असेल ज्याला देशातील शेवटचं स्टेशन म्हणता येईल. 

तर भारतात असं एक शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. ज्यातील एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात जोगबनी येथे आहे. या स्टेशनला देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. इथून नेपाळमध्ये पायी जाता येतं. त्याशिवाय पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशनही भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. या स्टेशनवरील प्रत्येक गोष्ट इंग्रजांच्या काळातील आहे.

भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे. जे बांग्लादेशच्या सीमेजवळ आहे. बांग्लादेशच्या जवळ असल्याने इथून तिकडे पायी जाता येतं.भारताची फाळणी झाल्यानंतर या स्टेशनच्या मेंटनन्सचं काम जसंच्या तसं थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे इथून कोणतीही गाडी जात नव्हती. पण 1978 मध्ये जेव्हा मालगाड्या सुरू झाल्या तेव्हा पुन्हा रेल्वे आणि हार्नचा आवाज येऊ लागला. या गाड्या आधी बांग्लादेशपर्यंत जात होत्या. पण 2011 मध्ये शेजारी नेपाळपर्यंतही जात होत्या.

भलेही इथून गाड्यांची ये-जा सुरू झाली असेल, पण या स्टेशनच्या रंग-रूपात काहीच बदल झाला नाही. हे स्टेशन आजही जसंच्या तसंच आहे, जसं इंग्रज सोडून गेले होते. इथून मालगाडीशिवाय दोन मैत्री एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वेही जातात.

या स्टेशनचा वापर कोलकाता आणि ढाका दरम्यान रेल्वे कनेक्टिविटीसाठी केला जात होता. पण ही रेल्वे स्वातंत्र्य आधीची आहे. त्यामुळे ढाका येथे जाण्यासाठी महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांनी अनेकदा या मार्गाचा वापर केला होता. कधीकाळी इथून दार्जिलिंग मेल सारख्या गाड्याही जात होत्या. पण आता इथून केवळ मालगाड्या जातात.

या स्टेशनवर आजही जुन्या काळातील हाताच्या गिअरच्या सिग्नचा वापर केला जातो. सोबतच इथे जास्त रेल्वे कर्मचारीही ठेवले जात नाहीत.इतकंच नाही तर टिकीट काउंटरही बंद झालं आहे. जास्त कर्मचारी नसतात कारण जेव्हा मालगाडी जाते तेव्हा फक्त सिग्नल द्यायचा असतो. जी रोहनपूर मार्गे बांग्लादेशला जाते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके