शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 18:11 IST

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात.

आपल्या देशाचा इतिहास फारच रोमांचक राहिला आहे. इतिहासाच्या पानांवर केवळ वीर राजे-महाराजेच नाही तर अनेक राण्यांचीही नावे नोंदवली आहेत. अशा राण्या ज्यांनी मातृभूमीच्या मान-सन्मानासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यातीलच एक राणी म्हणजे हाडीराणी.

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. १६व्या शतका दरम्यान हाडीराणीचा विवाह सलूंबरचे राव रतन सिंह यांच्यासोबत झाला होता. दोघांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि युद्धाने त्यांचा दरवाज्यावर धडक दिली. 

हे युद्ध किशनगढचे राजा मान सिंह आणि औरंगजेब यांच्यात होणार होतं. औरंगजेबने आक्रमणाची पूर्ण तयारी केली होती. इकडे राजा राजसिंह, औरंगजेबाला किशनगढाच्या आधीच रोखण्याचा विचार करत होते. म्हणून त्यांनी ही मोठी जबाबदारी राव रतन सिंह यांच्याकडे सोपवली. राव रतन सिंह यांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि अशाप्रकारे राणी पासून दूर होणं त्यांना सलत होतं. त्यांचं राणी हाडीवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्यापासून दूर जावं लागत असल्याने दु:खी होते. (हे पण वाचा : जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह)

युद्धादरम्यान मैदानात जाण्यापूर्वी राव रतन सिंह यांना राणीची एखादी निशाणी सोबत न्यायची होती. जेणेतरून त्यांना वेगळे झाल्याची जाणीव होऊ नये. यामुळे त्यांनी युद्धावर जाण्याआधी सैनिकांना राणीची निशाणी आणण्यास सांगितलं. राव रतन सिंह यांच्या आदेशावरून सैनिक निशाणी आणण्यासाठी राणीकडे गेला. हाडीराणी यांना समजलं होतं की, त्यांचे पती प्रेम मोहाच्या बाहेर निघत नाहीयेत. ज्यामुळे त्यांना युद्धाच्या मैदानात जाण्यास अडचण येत होती.

मातृभूमिची रक्षा आणि मान-सन्मानासाठी  हाडी राणी यांनी आपलं शिर कापून सैनिकांकडे दिलं. जेणेकरून त्यांचं पतीचं लक्ष प्रेमावर नाही तर मातृभूमीच्या रक्षणावर असावं. हाडी राणीने स्वत:च्या प्राणांचं बलिदान देऊन आपल्या पतीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि अमर झाली.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहासJara hatkeजरा हटके