शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजबच! 30 वर्षाआधी मृत मुलीच्या लग्नासाठी वर शोधत आहे कुटुंब, जाहिरातीत ठेवल्या 'अशा' अटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:39 IST

सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

लग्नासाठी वर किंवा वधु हवेत अशा वेगवेगळ्या अवाक् करणाऱ्या जाहिरातील आपण बघत असतो. ज्यात अनेक अजब अटीही दिलेल्या असतात. ज्या नेहमीच व्हायरल होत असतात. पण सध्या कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या एका वृत्तपत्रातील एक जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. जी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

ही अजब जाहिरात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरमधील एका परिवाराने दिली आहे. या परिवाराचं असं मत आहे की, त्यांच्या दिवंगत मुलीचं लग्न न झाल्याने त्यांच्या परिवारावर संकटं येत आहेत.

परिवारानुसार, साधारण तीस वर्षाआधी नवजात मुलीचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून परिवाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक संकटं त्यांच्यावर आली आहेत.

परिवाराने जेव्हा वयोवृद्ध लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, होऊ शकतं की, दिवंगत मुलीची भटकत असलेली आत्मा याचं कारण असू शकतं. आता परिवाराने तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या मुलीसाठी वर शोधण्यासाटी वृत्तपत्रात जाहिरात दिली. जी सध्या चर्चेत आहे.

जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलं की, 'तीस वर्षाआधी मरण पावलेल्या नवरीसाठी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या नवरदेवाशा शोध आहे. कृपया प्रेत मुदुवा म्हणजे प्रेतांच्या विवाहासाठी संबंधित नंबरवर फोन करा'.

पण मृत मुलीचे आई-वडील अनेक प्रयत्न करूनही तिच्या वयाचा, जातीचा आणि तेवढ्या वर्षाआधी मृत झालेला वर न मिळाल्याने दु:खी आहेत.

मृत व्यक्तींच्या अपारंपारिक लग्नाची परंपार तुलुनाडू भागात प्रचलित आहे. या भागाच्या अंतर्गत कर्नाटक आणि केरळच्या कासरगोड जिल्ह्याचे काही भागही येतात. येथील स्थानिक भाषा तुलु असते. या भागांमध्ये मृत लोकांचं लग्न लावण्याला भावनात्मक महत्व आहे.

तुलुवा लोकांच्या संस्कृतीचे जाणकार सांगतात की, या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, दिवंगत आत्म्यांचा परिवारासोबत संबंध असतो आणि ते आनंद किंवा दु:खात सोबत असतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके