शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अजबच! 30 वर्षाआधी मृत मुलीच्या लग्नासाठी वर शोधत आहे कुटुंब, जाहिरातीत ठेवल्या 'अशा' अटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:39 IST

सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

लग्नासाठी वर किंवा वधु हवेत अशा वेगवेगळ्या अवाक् करणाऱ्या जाहिरातील आपण बघत असतो. ज्यात अनेक अजब अटीही दिलेल्या असतात. ज्या नेहमीच व्हायरल होत असतात. पण सध्या कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या एका वृत्तपत्रातील एक जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. जी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण सामान्यपणे जिवंत व्यक्तींसाठी वर-वधु पाहिजे अशा जाहिराती असतात. मात्र इथे 30 वर्षाआधी मृत महिलेसाठी सुयोग्य वर हवी असल्याची जाहिरात देण्यात आली आहे.

ही अजब जाहिरात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरमधील एका परिवाराने दिली आहे. या परिवाराचं असं मत आहे की, त्यांच्या दिवंगत मुलीचं लग्न न झाल्याने त्यांच्या परिवारावर संकटं येत आहेत.

परिवारानुसार, साधारण तीस वर्षाआधी नवजात मुलीचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून परिवाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक संकटं त्यांच्यावर आली आहेत.

परिवाराने जेव्हा वयोवृद्ध लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, होऊ शकतं की, दिवंगत मुलीची भटकत असलेली आत्मा याचं कारण असू शकतं. आता परिवाराने तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या मुलीसाठी वर शोधण्यासाटी वृत्तपत्रात जाहिरात दिली. जी सध्या चर्चेत आहे.

जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलं की, 'तीस वर्षाआधी मरण पावलेल्या नवरीसाठी 30 वर्षाआधी मरण पावलेल्या नवरदेवाशा शोध आहे. कृपया प्रेत मुदुवा म्हणजे प्रेतांच्या विवाहासाठी संबंधित नंबरवर फोन करा'.

पण मृत मुलीचे आई-वडील अनेक प्रयत्न करूनही तिच्या वयाचा, जातीचा आणि तेवढ्या वर्षाआधी मृत झालेला वर न मिळाल्याने दु:खी आहेत.

मृत व्यक्तींच्या अपारंपारिक लग्नाची परंपार तुलुनाडू भागात प्रचलित आहे. या भागाच्या अंतर्गत कर्नाटक आणि केरळच्या कासरगोड जिल्ह्याचे काही भागही येतात. येथील स्थानिक भाषा तुलु असते. या भागांमध्ये मृत लोकांचं लग्न लावण्याला भावनात्मक महत्व आहे.

तुलुवा लोकांच्या संस्कृतीचे जाणकार सांगतात की, या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, दिवंगत आत्म्यांचा परिवारासोबत संबंध असतो आणि ते आनंद किंवा दु:खात सोबत असतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके