शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"साहेब, माझे कुटुंबीय माझं लग्न करत नाहीत त्यामुळे मी वेडा होतोय"; तरुणाची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:03 IST

"साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील माझं लग्न करू देत नाहीत अशी तक्रार एका 30 वर्षीय तरुणाने केली आहे. "साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची तक्रार ऐकून सर्वच जण आधी हैराण झाले. 

पोलीस कर्मचारी त्याच्यावर हसले. वरिष्ठांना अर्ज देऊन आपलं लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालौन तालुक्यातील शेखपूर गावातील रहिवासी शाहिद शाह यांचा मुलगा मिठ्ठू लग्नासाठी अर्ज घेऊन उराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. अरविंद यादव यांना अर्ज दिला. अर्ज देताना त्यानं सांगितलं की, त्याचं वय 30वर्षे आहे. मात्र, अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे तो आयुष्य जगण्याच्या हक्कापासून वंचित राहत आहे. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहे. 

घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजूनही त्याच्या लग्नाचा विचार केलेला नाही. त्यामुळेच तो मानसिकदृष्ट्या जास्त अस्वस्थ होत आहे. जर त्याचं लग्न झाले नाही तर तो वेडा होईल. लग्नानंतर तो आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवेल. शिवाय, लग्न करून दिल्याबद्दल तो पोलिसांचा सदैव ऋणी राहीन, असंही मिठूने सांगितलं.

मिठूचा विनंती अर्ज पोलीस स्टेशनमध्ये येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी निरीक्षकांनी त्याचा अर्ज वाचला. बसवून त्याच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर आणि लग्न लावून देण्याचं आश्वासनही दिलं. अर्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या नातेवाईकांनाही बोलावलं. दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"