शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब, माझे कुटुंबीय माझं लग्न करत नाहीत त्यामुळे मी वेडा होतोय"; तरुणाची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:03 IST

"साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील माझं लग्न करू देत नाहीत अशी तक्रार एका 30 वर्षीय तरुणाने केली आहे. "साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या" अशी तक्रार घेऊन एक तरुण उरई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची तक्रार ऐकून सर्वच जण आधी हैराण झाले. 

पोलीस कर्मचारी त्याच्यावर हसले. वरिष्ठांना अर्ज देऊन आपलं लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालौन तालुक्यातील शेखपूर गावातील रहिवासी शाहिद शाह यांचा मुलगा मिठ्ठू लग्नासाठी अर्ज घेऊन उराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. अरविंद यादव यांना अर्ज दिला. अर्ज देताना त्यानं सांगितलं की, त्याचं वय 30वर्षे आहे. मात्र, अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे तो आयुष्य जगण्याच्या हक्कापासून वंचित राहत आहे. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहे. 

घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजूनही त्याच्या लग्नाचा विचार केलेला नाही. त्यामुळेच तो मानसिकदृष्ट्या जास्त अस्वस्थ होत आहे. जर त्याचं लग्न झाले नाही तर तो वेडा होईल. लग्नानंतर तो आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवेल. शिवाय, लग्न करून दिल्याबद्दल तो पोलिसांचा सदैव ऋणी राहीन, असंही मिठूने सांगितलं.

मिठूचा विनंती अर्ज पोलीस स्टेशनमध्ये येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी निरीक्षकांनी त्याचा अर्ज वाचला. बसवून त्याच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर आणि लग्न लावून देण्याचं आश्वासनही दिलं. अर्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या नातेवाईकांनाही बोलावलं. दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"