शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राज्यातील 'हा' रेल्वे ट्रॅकही आजही ब्रिटिशांच्या ताब्यात; भारताला द्यावा लागतो कर, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:14 IST

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारतातील एकमेव रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रात आहे...

भारतात दररोज हजारो ट्रेन धावतात. या ट्रेनमधून कोट्यवधी लोक प्रवास करतात. त्यामुळेच तर रेल्वेला लाईफलाईन म्हटलं जातं. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. पण आजही भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे, ज्यावर ब्रिटनचा ताबा आहे. या ट्रॅकवरून ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वेला ब्रिटनमधील एका खासगी कंपनीला वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये द्यावे लागतात.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आली तरीही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला रेल्वे ट्रॅक अमरावतीत आहे. या ट्रॅकवरून शंकुतला एक्स्प्रेस धावते. त्यामुळे हा रेल्वे ट्रॅक शंकुतला रेल्वे ट्रॅक म्हणून ओळखला जातो. १९०३ मध्ये ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सननं या ट्रॅकचं काम सुरू केलं. १९१६ मध्ये तो तयार झाला. ही कंपनी आज सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनी नावानं ओळखली जाते.

अमरावती कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कापूस मुंबईतील बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रज या ट्रॅकचा वापर करायचे. कापसाच्या शेतीमुळे ब्रिटनमधील खासगी कंपनीनं हा ट्रॅक विकसित केला. या ट्रॅकवर आजही त्याच कंपनीचा ताबा आहे. त्याची देखभाल कंपनीकडूनच केली जाते. त्यासाठी भारतीय रेल्वेला सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनीला दरवर्षी पैसे द्यावे लागतात.

ब्रिटिश कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी पैसे दिले जात असूनही रेल्वे ट्रॅकची स्थिती वाईट आहे. त्यामुळे या ट्रॅकवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग जास्तीत जास्त २० किमी प्रतितास असतो. या रेल्वे मार्गावरून दररोज हजारो लोक प्रवास करतात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे