शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यातील 'हा' रेल्वे ट्रॅकही आजही ब्रिटिशांच्या ताब्यात; भारताला द्यावा लागतो कर, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:14 IST

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारतातील एकमेव रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रात आहे...

भारतात दररोज हजारो ट्रेन धावतात. या ट्रेनमधून कोट्यवधी लोक प्रवास करतात. त्यामुळेच तर रेल्वेला लाईफलाईन म्हटलं जातं. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. पण आजही भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे, ज्यावर ब्रिटनचा ताबा आहे. या ट्रॅकवरून ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वेला ब्रिटनमधील एका खासगी कंपनीला वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये द्यावे लागतात.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आली तरीही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला रेल्वे ट्रॅक अमरावतीत आहे. या ट्रॅकवरून शंकुतला एक्स्प्रेस धावते. त्यामुळे हा रेल्वे ट्रॅक शंकुतला रेल्वे ट्रॅक म्हणून ओळखला जातो. १९०३ मध्ये ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सननं या ट्रॅकचं काम सुरू केलं. १९१६ मध्ये तो तयार झाला. ही कंपनी आज सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनी नावानं ओळखली जाते.

अमरावती कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कापूस मुंबईतील बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रज या ट्रॅकचा वापर करायचे. कापसाच्या शेतीमुळे ब्रिटनमधील खासगी कंपनीनं हा ट्रॅक विकसित केला. या ट्रॅकवर आजही त्याच कंपनीचा ताबा आहे. त्याची देखभाल कंपनीकडूनच केली जाते. त्यासाठी भारतीय रेल्वेला सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनीला दरवर्षी पैसे द्यावे लागतात.

ब्रिटिश कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी पैसे दिले जात असूनही रेल्वे ट्रॅकची स्थिती वाईट आहे. त्यामुळे या ट्रॅकवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग जास्तीत जास्त २० किमी प्रतितास असतो. या रेल्वे मार्गावरून दररोज हजारो लोक प्रवास करतात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे