शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:33 IST

Gallup Report says women getting angrier:लोकांमध्ये तणाव आणि रागाचा स्तर वेगाने वाढत आहे. खासकरून भारतीय महिलांमध्ये. ग्लोबल सर्वेनुसार, भारतीय महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत रागाची भावना दुप्पट आहे.

Gallup Report says women getting angrier: जगभरात पुरूषांच्या तुलने आक्रोशाची भावना वाढत आहे. असं आमचं नाही तर एका ग्लोबल सर्वेचं मत आहे. काळानुसार लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहे. या बदलासोबत आता इमोशन स्केलही वाढत आहे. लोकांमध्ये तणाव आणि रागाचा स्तर वेगाने वाढत आहे. खासकरून भारतीय महिलांमध्ये. ग्लोबल सर्वेनुसार, भारतीय महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत रागाची भावना दुप्पट आहे.

धक्कादायक खुलासा

हा ग्लोबल इमोशनल पोल तयार केला आहे 'गॅलप वर्ल्ड पोल' ने. ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. 2012 पासून ते 2021 दरम्यान लोकांची मनस्थिती हैराण करणारी होती. गॅलप वर्ल्ड पोलने या अभ्यासासाठी 150 देशांचा समावेश केला होता. ज्यात 12 लाख लोक या सर्वेचा भाग बनले. ज्याचे निष्कर्ष हैराण करणारे होते.

सर्वेतून काय आलं समोर

वेगाने बदलत आहे जगाची स्थिती, आता त्यांच्या इमोशन्सना प्रभावित करत आहे. गॅलपच्या सर्वेनुसार, एक दशकाआधी महिलांचा राग पुरूषांच्या बरोबर होता, पण सध्या 6 टक्क्यांनी वाढला आहे. हे तर झालं जगातील महिलांबाबत. पण जर भारत आणि पाकिस्तानातील महिलांबाबत सांगायचं तर सर्वेचे निष्कर्ष विचारात पाडतात. कारण जगाच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानमधील महिलांमध्ये रागची भावना दुप्पट आहे. आकडेवारीनुसार, समजून घ्यायचं तर जिथे जगात महिलांच्या रागाचा स्तर पुरूषांच्या तुलनेत 6 टक्के आहे. तेच भारत आणि पाकिस्तानातील महिलांमध्ये हा  12 टक्के जास्त आहे. 

महिलांमध्ये जास्त रागाचं कारण?

2019 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांच्या भावनात्मक बदलात एक मोठी नकारात्मक भूमिका निभावली. लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन, हाइपर टेंशन आणि रागाची समस्या वेगाने वाढत आहे. खासकरून त्या महिलांमध्ये घर सांभाळण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या होत्या. गेल्या दशकातील शेवटच्या दोन वर्षात महिलांच्या रागात वाढ झाली आहे. जगातल्या जास्तीत जास्त महिला आता जास्त शिकलेल्या आणि सेल्प डिपेंडेंट आहेत. जॉब कल्चर वाढल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे त्या चुकीच्या व्यवहारावर लगेच व्यक्त होतात. पण या बदलत्या काळातही पुरूष प्रधान विचार शिल्लक आहेत. तरीही जास्तीत जास्त घरांतील महिला कुठेना कुठे बिनधास्तपणे आक्रोश व्यक्त करत आहेत.

काय आहे यामागचं कारण?

नोकरीत उच्च पदाचा विषय असो वा पगाराचा विषय असो. महिलांना कमी समजणं किंवा त्यांच्यासोबत भेदभाव करणं त्यांच्या रागाचं मुख्य कारण आहे. महिलांमध्ये वाढत असणाऱ्या रागाला चुकीचं म्हणणं तर सोपं आहे. पण त्याच्या कारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.घर असो वा बाहेर प्रत्येक ठिकाणी महिलांना कमी लेखणं दशकांपासून नुकसानकारक ठरत आहे. पण बदलत्या काळात महिला त्यांच्या हिंमतीने पुढे जात आहेत. पण हा आत्मविश्वास त्यांच्यात कुठेना कुठे राग निर्माण करत आहे. 

त्यासोबत महिलांनी त्यांचं यश आणि आत्मविश्वासाला उत्साहात न घेता सकारात्मक पद्धतीने समाजासमोर सादर करावं. आपसी सहयोगाने समाजाला योग्य दिशेने नेता येऊ शकतं. या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत महिलांच्या रागीट प्रतिमेला बदलता येऊ शकतं.

टॅग्स :WomenमहिलाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके