शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टीनएजर्संना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर अर्थव्यवस्थेते पडेल 5319 अब्ज रूपयांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:18 IST

टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल.

ठळक मुद्देटीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल, टीनएजर्स जर जास्त वेळ झोपू दिलं तर आयुष्यातील विद्यार्थी कमाईमध्ये डॉलर 17,500 ने म्हणजेच अकरा लाखापेक्षा जास्त रक्कमेची भर पडेल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई, दि. 15- तरूण मुलं जास्त झोपतात अशी ओरड नेहमी ऐकु येत असते. जास्त झोपण्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतात, असंही नेहमी आपण ऐकत असतो. पण टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल, अशी एक बाब समोर आली. टीनएजर्स जर जास्त वेळ झोपू दिलं तर आयुष्यातील विद्यार्थी कमाईमध्ये डॉलर 17,500 ने म्हणजेच अकरा लाखापेक्षा जास्त रक्कमेची भर पडेल, असं द न्यूयॉर्क टाइम्सने अहवालात म्हंटलं आहे.

युएसमधील काही शाळा सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू होतात. तसंच तेथिल  90 टक्के उच्च माध्यमिक शाळा आणि 80 टक्के माध्यमिक शाळा साडे आठच्या आधीही सुरू होतात. पण जर या शाळेच्या वेळेमध्ये बदल करून उशिराचा वेळ ठरवला तर तो मुलांनी दोन महिन्यांचा जास्त अभ्यास केल्याच्या बरोबरची आहे. याचाच अर्थ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने जास्त ज्ञान मिळविल्यासारखा आहे. जर विद्यार्थ्यांना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असून अर्थव्यवस्थेत 83 बिलियन डॉलरची (5319 अब्ज रूपये) भर पडेल. सहा इतर अभ्यासानुसार, जर शाळेची वेळ नियमीत वेळेपेक्षा 25 ते 60 मिनीट उशिराची असेल तर त्या मुलाला सकाळी 25 ते 77 मिनिटांची झोप जास्त घेता येइल. 

पण यामध्ये इतर अनेक मुद्देही आहेत तेसुद्धा अहवालात नमुद करण्यात आले आहेत. मुलांना जास्त वेळ झोपू देण्यासाठी त्यांच्या पालकांना काही तोटे सहन करावे लागतील. पहिला तोटा म्हणजे प्रवासखर्चात होणारी वाढ. शाळेची वेळ जर उशिराची असेल तर जास्त रहदारीच्या वेळेत विद्यार्थ्याला प्रवास करावा लागेल अर्थातच प्रवासासाठी येणारा खर्च यामुळे वाढेल. शाळा उशिरा सुरू झाली तर सुटायची वेळही उशिराशी असेल. त्यामुळे पालक ऑफिसवरून घरी जाताना मुलांना शाळेतून घेण्याचा विचार करत असतील, तर तेही सोपं नाही. कारण शाळेची वेळ आणि पालकांची ऑफिसवरून निघायची वेळ सारखी होणार नाही. याव्यतिरिक्त, जास्त रहदारीच्या वेळी मुलाला प्रवास करावा लागणार असल्याने प्रति विद्यार्थी  150 डॉलर खर्च वाढेल, तर शाळांनासुद्धा याचा तोटा होइल. पायाभूत सुविधांसाठी शाळांचे सुमार डॉलर 110,000 खर्ची होतील. तर दुसरीकडे, मुलांना जास्त झोप मिळाली तर त्याच्या शैक्षणिक यशात आणि विद्यार्थी कमाईमध्येही भर पडेल. विद्यार्थ्यालाच याचा फायदा होणार असल्याचं अहवालात म्हंटलं आहे.