शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

...तोपर्यंत मी घरीच येणार नाही! सेकंड हँड कार पाहून बायको निघून गेली माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 15:38 IST

पत्नीची तक्रार घेऊन पती पोलीस ठाण्यात गेली अन् मग...

बरेली: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार खरेदीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. प्रकरण एसएसपी कार्यालयापर्यंत पोहोचलं. पतीनं सेकंड हँड कार खरेदी केल्यानं पत्नी नाराज होऊन माहेरी निघून गेली. जोपर्यंत नवी कार घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं म्हणत पत्नी हट्टाला पेटली आहे. माहेरी गेलेली पत्नी येत नसल्यानं पतीनं पोलिसांकडे धाव घेतली.

बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पत्नी बऱ्याच दिवसांपासून कार खरेदी करा म्हणून मागे लागली होती. तिचा हट्ट पुरवण्यासाठी पतीनं सेकंड हँड कार खरेदी करण्याची तयारी दर्शवली. ते ऐकून पत्नी संतापली. जोपर्यंत नवी कार घेत नाही, तोपर्यंत माहेरीच राहणार असल्याची भूमिका तिनं घेतली, अशी तक्रार पीडित संजीव शर्मांनी एसएसपी कार्यालयात केली.  माझी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे कार खरेदी करू शकत नसल्याचं म्हणत शर्मांनी त्यांची व्यथा पोलिसांकडे मांडली. पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पैसे आल्यावर नवी कार खरेदी करू. तोपर्यंत सेकंड हँड खरेदी करू, असं त्यानं पत्नीला सांगितलं. मात्र तरीही पत्नी ऐकली नाही. ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. 

संजीव शर्मांचा विवाह २००७ मध्ये झाला. त्यांना दोन मुलं आहेत. पत्नी लहानसहान गोष्टींवर संशय घेत असल्याचा, वारंवार अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्नी अनेकदा मला न विचारताच माहेरी जाते. पत्नी आणि तिच्या माहेरचे लोक माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी करतात. त्यामुळे पोलीस मला त्रास देतात, अशा शब्दांत शर्मांनी व्यथा मांडली.