शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:29 IST

UP News : काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

UP News : दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही चार ते पाच दिवसांआधी अशीच एक घटना चर्चेत आली होती. एका पतीनं त्याच्या पत्नीचं लग्न सगळ्या गावासमोर तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं होतं. पण आता या कहाणीत एक ट्विस्ट आला आहे. पत्नीच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्यानंतर पती पत्नीला चार दिवसात घरी परत घेऊन आला. 

काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीच्या इच्छेखातर पती बबलू यानं तिचा प्रियकर विकाससोबत तिचं लग्न लावून दिलं. पण आता तो चार दिवसातच आपल्या पत्नीला परत घेऊन आला.

चार दिवसातच या अजब कहाणीमध्ये ट्विस्ट आला. प्रियकर विकाससोबत गेलेली राधिका पती बबलूसोबत परत आली. 28 मार्च रोजी बबलू पत्नीला घेण्यासाठी विकासच्या घरी गेला होता. बबलूनं विकासला विनंती केली की, त्यानं त्याची पत्नी त्याला परत करावी. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विकासनं राधिकाला बबलूच्या हवाली केलं.

विकासच्या आईनं सांगितलं की, आम्ही आधीच लग्नाला विरोध केला होता. पण लोकांना जबरदस्ती त्यांचं लग्न लावून दिलं होतं. बबलू सायंकाळी आला होता आणि म्हणाला की, दोन मुलांना तो सांभाळू शकत नाहीये. त्याच्याकडून चूक झाली. दोघांनी चर्चा केल्यानंतर विकास राधिकाला त्याच्यासोबत परत पाठवण्यास तयार झाला. विकास आता कामासाठी बाहेरगावी गेला आहे. तर बबलू पत्नीला घेऊन शहरात राहत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 2017 साली बबलू आणि राधिकाचं लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. काही महिन्यांनी बबलू मजुरीचं काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्यानंतर त्याची पत्नी राधिका गावातीलच विकासच्या प्रेमात पडली. अलिकडेल बबलूला याची माहिती मिळाली होती. अशात त्यानं भांडण करण्याऐवजी पत्नीचं लग्न विकाससोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. 

गावातील लोकांसोबत बोलल्यानंतर बबलूनं पत्नी राधिकाचं लग्न विकाससोबत लावण्याचं ठरवलं. हिंदू रिती-रिवाजासोबत त्यानं पत्नीचं लग्न विकाससोबत मंदिरात लावून दिलं. कोर्टात जाऊनही त्यानं तसा अर्ज केला. लग्नानंतर बबलूनं नवरी-नवरदेवासोबत फोटोही काढला. पण चार दिवसांनंतर त्याला पत्नीचं आठवण येऊ लागली होती. त्यानंतर तो पत्नीला घेऊन आला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश