शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:29 IST

UP News : काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

UP News : दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही चार ते पाच दिवसांआधी अशीच एक घटना चर्चेत आली होती. एका पतीनं त्याच्या पत्नीचं लग्न सगळ्या गावासमोर तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं होतं. पण आता या कहाणीत एक ट्विस्ट आला आहे. पत्नीच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्यानंतर पती पत्नीला चार दिवसात घरी परत घेऊन आला. 

काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीच्या इच्छेखातर पती बबलू यानं तिचा प्रियकर विकाससोबत तिचं लग्न लावून दिलं. पण आता तो चार दिवसातच आपल्या पत्नीला परत घेऊन आला.

चार दिवसातच या अजब कहाणीमध्ये ट्विस्ट आला. प्रियकर विकाससोबत गेलेली राधिका पती बबलूसोबत परत आली. 28 मार्च रोजी बबलू पत्नीला घेण्यासाठी विकासच्या घरी गेला होता. बबलूनं विकासला विनंती केली की, त्यानं त्याची पत्नी त्याला परत करावी. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विकासनं राधिकाला बबलूच्या हवाली केलं.

विकासच्या आईनं सांगितलं की, आम्ही आधीच लग्नाला विरोध केला होता. पण लोकांना जबरदस्ती त्यांचं लग्न लावून दिलं होतं. बबलू सायंकाळी आला होता आणि म्हणाला की, दोन मुलांना तो सांभाळू शकत नाहीये. त्याच्याकडून चूक झाली. दोघांनी चर्चा केल्यानंतर विकास राधिकाला त्याच्यासोबत परत पाठवण्यास तयार झाला. विकास आता कामासाठी बाहेरगावी गेला आहे. तर बबलू पत्नीला घेऊन शहरात राहत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 2017 साली बबलू आणि राधिकाचं लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. काही महिन्यांनी बबलू मजुरीचं काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्यानंतर त्याची पत्नी राधिका गावातीलच विकासच्या प्रेमात पडली. अलिकडेल बबलूला याची माहिती मिळाली होती. अशात त्यानं भांडण करण्याऐवजी पत्नीचं लग्न विकाससोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. 

गावातील लोकांसोबत बोलल्यानंतर बबलूनं पत्नी राधिकाचं लग्न विकाससोबत लावण्याचं ठरवलं. हिंदू रिती-रिवाजासोबत त्यानं पत्नीचं लग्न विकाससोबत मंदिरात लावून दिलं. कोर्टात जाऊनही त्यानं तसा अर्ज केला. लग्नानंतर बबलूनं नवरी-नवरदेवासोबत फोटोही काढला. पण चार दिवसांनंतर त्याला पत्नीचं आठवण येऊ लागली होती. त्यानंतर तो पत्नीला घेऊन आला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश