शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

आंघोळ करताना क्रिएटिव्ह आयडिया, समस्यांचं सोल्युशन कसं काय मिळतं बुवा? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:19 IST

नोकरीशी संबंधित असो अथवा घरातली कोणतीही समस्या तुम्हाला त्यावरचा उपाय हा अंघोळीदरम्यान सापडतो. असं का होतं?, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर बरेच लोक आपपल्या मतानुसार देऊ शकतात. पण आज आम्ही तुम्हाला याचं शास्त्रीय कारण सांगणार आहोत.

जेव्हा तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ (Bath) करता, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की त्या कालावधीत तुम्हाला अनेक कल्पना (Idea) सुचतात. नोकरीशी संबंधित असो अथवा घरातली कोणतीही समस्या तुम्हाला त्यावरचा उपाय हा अंघोळीदरम्यान सापडतो. असं का होतं?, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर बरेच लोक आपपल्या मतानुसार देऊ शकतात. पण आज आम्ही तुम्हाला याचं शास्त्रीय कारण सांगणार आहोत.

72 टक्के लोकांना आंघोळीदरम्यान अतिशय क्रिएटिव्ह कल्पना सुचतात, असं बिझनेस इनसाइडर वेबसाईटवरील 2016 च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रीडर्स डायजेस्ट वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्या मेंदूतला (Brain) छोटासा भाग मेंदूचं अन्य कामावरचं लक्ष काढून टाकतो आणि त्याला शरीर स्वच्छ करण्याच्या कामात गुंतवतो. त्यावेळी अन्य कामांमधून उसंत मिळाल्याने दुसरा भाग विचारांमध्ये हरवून जातो. त्यामुळे या वेळी खूप चांगले विचार मनात येऊ लागतात आणि कल्पना सुचायला सुरुवात होते.

लाइफ हॅकर वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, जेव्हा आपण व्यायाम करतो, संगीत ऐकतो किंवा आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन (Dopamine) मोठ्या प्रमाणात रिलीज होतं. डोपामाईन हे एक प्रकारचं हॉर्मोन (Hormone) आहे. ते रिलीज होताच माणसाला प्रेरणादायी वाटू लागतं, तो आनंदी राहतो आणि त्याला अनेक गोष्टी आठवू लागतात. डोपामाइन जास्त प्रमाणात रिलीज झालं तर माणसाला आरामदायी (Relax) वाटू लागतं. जेव्हा आपल्याला अधिक आरामदायी वाटतं, तेव्हा आपण स्वतःबद्दल अधिक विचार करू शकतो, चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवू शकतो. त्यामुळे अशावेळी मनात सर्जनशील कल्पना अधिक येतात.

आंघोळीवेळी चांगल्या कल्पना सुचण्यामागं अजून एक कारण आहे. आपण वर उल्लेख केल्यानुसार आपण दैनंदिन कामांपासून दूर जातो आणि मेंदूचा एक भाग शरीर स्वच्छ करण्यावर लक्ष केंद्रित करतो तर दुसरा भाग कल्पनांवर विचार करू लागतो. अशा परिस्थितीत माणसाचं मन सौम्य विचलित (Distracted) होणं हे देखील फायदेशीर आहे, असं शास्त्रज्ञ सांगतात. रीडर्स डायजेस्टच्या मते, या कारणामुळे, आपण जर कॉफी शॉपमध्ये काम करत असतो किंवा जॉगिंग करतो तेव्हा आपण जास्त उत्पादनक्षम बनतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आंघोळ केली पाहिजे कारण डोपामाइन रिलीज झाल्याने मेंदूला काहीसा आराम मिळतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके