शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतली

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 09:10 IST

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं, बिहारच्या सीमाभागात कटिहार परिसरात सध्या एक अजब प्रेम की गजब कहाणी समोर आली आहे. याठिकाणी दहावीच्या मुलीनं केलेल्या प्रेमाची चर्चा सध्या गावभर आहे, मनिहारी ठाणे हद्दीत दहावीच्या बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या मुलीने थेट लग्न मंडपात जाऊन लग्न केले, या घटनेची चर्चा गावकऱ्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते, मात्र दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या या युवतीला युवकासोबत गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. माहितीनुसार, मनिहारी ठाणे हद्दीतील लाल सुरेंद्र नारायण कन्या शाळेतील हे प्रकरण आहे. याठिकाणी दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती, प्रेयसी ही परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती. तिचं नाव गौरी(बदलेलं नाव) आहे. तर प्रियकराचं नाव नितीश आहे, नितीश हा बरारी येथील गुजरा गावात राहणारा तरूण आहे.

नितीश परीक्षा सेंटरवर प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता, तेव्हा संशयावरून काही गावकऱ्यांनी दोघा प्रेमीयुगलांना पकडलं, पोलिसांना याबाबत सूचना देऊन त्यांना ताब्यात देण्यात आलं, त्यानंतर संपूर्ण प्रकरण प्रेमसंबंधांशी जोडलं गेलं आहे, हे समजताच पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी करत दोघांच्या लग्नासाठी तयार केलं, त्यानंतर या दोघांचे लग्न झालं,  

 

टॅग्स :marriageलग्न