शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:57 IST

Ghost Village of India: कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

Ghost Village of India: राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. येथील किल्ले-महाल आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. पण येथील एक गाव वेगळ्याच कारणानं चर्चेत असतं. येथील कुलधरा हे एक असं गाव आहे जिथे एक अजब शांतता आहे. कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

जयपूरजवळ कुलधरा कधीकाळी पालीवाल ब्राम्हणांचं एक समृद्ध गाव होतं. येथील लोक बुद्धिमान होते आणि त्यांना व्यापाराचं कौशल्य होतं. साधारण २०० वर्षांआदी कुलधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील सगळे लोक रातोरात गायब झाले आणि याची त्यांनी काही खूणही सोडली नाही. या गावाच्या कहाणीमध्ये  एक स्थानिक शासक सलीम सिंहचा उल्लेख येतो. हा एका पालीवाली ब्राम्हणाच्या मुलीशी बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, गावातील लोकांनी त्याला विरोध केला. असं म्हणतात की, तेव्हा त्यानं गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती. गावातील लोक त्याच्यासमोर झुकले नाही आणि त्यांनी ठरवलं की, ते गाव सोडून जातील. असं सांगितलं जातं की, ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते.  जेणेकरून तिथे पुन्हा कुणी राहू नये. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा वसलं नाही.

कुलधराच्या पडक्या घरांनी या गावाला आणखी रहस्यमय बनवलं आहे. इथं कोणतेच प्राणी नाही. जीवन नाही. झाडं नाहीत. फक्त भयान शांतता. काही लोक दावा करतात की, त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते. तर काही लोक म्हणतात की, हवेत इथे काही आवाजही ऐकायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही येथील दगडांच्या संरचना सुरक्षीत आहेत. 

अनेक लोक असंही मानतात की, कुलधरातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथे भटकते. काही लोक दावा करतात की, रात्री इथून काही आवाज येतात. या गावाबाबत अनेक कथा प्रचलित असूनही इथे अनेक पर्यटक भेट देतात. येथील वास्तुकलेचं कौतुक करतात. तर काही लोक इथे वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात. पण अजूनही या गावातील लोक कुठे गेले हे कुणाला समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स