शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:57 IST

Ghost Village of India: कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

Ghost Village of India: राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. येथील किल्ले-महाल आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. पण येथील एक गाव वेगळ्याच कारणानं चर्चेत असतं. येथील कुलधरा हे एक असं गाव आहे जिथे एक अजब शांतता आहे. कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

जयपूरजवळ कुलधरा कधीकाळी पालीवाल ब्राम्हणांचं एक समृद्ध गाव होतं. येथील लोक बुद्धिमान होते आणि त्यांना व्यापाराचं कौशल्य होतं. साधारण २०० वर्षांआदी कुलधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील सगळे लोक रातोरात गायब झाले आणि याची त्यांनी काही खूणही सोडली नाही. या गावाच्या कहाणीमध्ये  एक स्थानिक शासक सलीम सिंहचा उल्लेख येतो. हा एका पालीवाली ब्राम्हणाच्या मुलीशी बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, गावातील लोकांनी त्याला विरोध केला. असं म्हणतात की, तेव्हा त्यानं गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती. गावातील लोक त्याच्यासमोर झुकले नाही आणि त्यांनी ठरवलं की, ते गाव सोडून जातील. असं सांगितलं जातं की, ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते.  जेणेकरून तिथे पुन्हा कुणी राहू नये. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा वसलं नाही.

कुलधराच्या पडक्या घरांनी या गावाला आणखी रहस्यमय बनवलं आहे. इथं कोणतेच प्राणी नाही. जीवन नाही. झाडं नाहीत. फक्त भयान शांतता. काही लोक दावा करतात की, त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते. तर काही लोक म्हणतात की, हवेत इथे काही आवाजही ऐकायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही येथील दगडांच्या संरचना सुरक्षीत आहेत. 

अनेक लोक असंही मानतात की, कुलधरातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथे भटकते. काही लोक दावा करतात की, रात्री इथून काही आवाज येतात. या गावाबाबत अनेक कथा प्रचलित असूनही इथे अनेक पर्यटक भेट देतात. येथील वास्तुकलेचं कौतुक करतात. तर काही लोक इथे वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात. पण अजूनही या गावातील लोक कुठे गेले हे कुणाला समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स