शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:57 IST

Ghost Village of India: कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

Ghost Village of India: राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. येथील किल्ले-महाल आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. पण येथील एक गाव वेगळ्याच कारणानं चर्चेत असतं. येथील कुलधरा हे एक असं गाव आहे जिथे एक अजब शांतता आहे. कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

जयपूरजवळ कुलधरा कधीकाळी पालीवाल ब्राम्हणांचं एक समृद्ध गाव होतं. येथील लोक बुद्धिमान होते आणि त्यांना व्यापाराचं कौशल्य होतं. साधारण २०० वर्षांआदी कुलधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील सगळे लोक रातोरात गायब झाले आणि याची त्यांनी काही खूणही सोडली नाही. या गावाच्या कहाणीमध्ये  एक स्थानिक शासक सलीम सिंहचा उल्लेख येतो. हा एका पालीवाली ब्राम्हणाच्या मुलीशी बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, गावातील लोकांनी त्याला विरोध केला. असं म्हणतात की, तेव्हा त्यानं गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती. गावातील लोक त्याच्यासमोर झुकले नाही आणि त्यांनी ठरवलं की, ते गाव सोडून जातील. असं सांगितलं जातं की, ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते.  जेणेकरून तिथे पुन्हा कुणी राहू नये. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा वसलं नाही.

कुलधराच्या पडक्या घरांनी या गावाला आणखी रहस्यमय बनवलं आहे. इथं कोणतेच प्राणी नाही. जीवन नाही. झाडं नाहीत. फक्त भयान शांतता. काही लोक दावा करतात की, त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते. तर काही लोक म्हणतात की, हवेत इथे काही आवाजही ऐकायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही येथील दगडांच्या संरचना सुरक्षीत आहेत. 

अनेक लोक असंही मानतात की, कुलधरातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथे भटकते. काही लोक दावा करतात की, रात्री इथून काही आवाज येतात. या गावाबाबत अनेक कथा प्रचलित असूनही इथे अनेक पर्यटक भेट देतात. येथील वास्तुकलेचं कौतुक करतात. तर काही लोक इथे वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात. पण अजूनही या गावातील लोक कुठे गेले हे कुणाला समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स