शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:05 IST

अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.

Viral News : किन्नर सुद्धा इतर सामान्य लोकांप्रमाणेच मनुष्य असतात. मात्र, समाजातीलच लोक त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. किन्नर लोकांचं जगणं इतर लोकांपेक्षा वेगळं असतं. नैसर्गिकरित्या त्यांचं शरीर जरा वेगळं असतं. पण शेवटी ते मनुष्यच आहेत. समाज त्यांना स्वीकारत नसला तरी ते त्यांच्या त्यांच्या विश्वास आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतात. अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.

देवासोबत लग्न आणि विधवा होण्याची परंपरा

लोकांना वाटतं की, किन्नर लग्न करत नाहीत. पण असं नाहीये. ते लग्न करतात, पण केवळ एका दिवसासाठी. किन्नर अर्जुन आणि नाग कन्या उलूपीचा पुत्र इरावनसोबत लग्न करतात. यादरम्यान ते मोठा उत्सव साजरा करतात आणि नाच-गाणंही करतात. या विवाहानंतर इरावन देवाची मूर्ती तोडली जाते. ज्यानंतर किन्नरांना विधवा मानलं जातं. त्यानंतर ते हिंदू-रितीरिवाजानुसार विधवेची वस्त्र धारण करतात आणि एक सामान्य जीवन जगू लागतात.

महाभारताशी निगडीत परंपरा

किन्नरांच्या या विवाह परंपरेची मुळं महाभारत काळाशी जुळलेली आहेत. कथेनुसार, महाभारत युद्धाआधी पांडवांनी मां कालीची पूजा केली. ज्यात एका अटीनुसार, एका राजकुमाराचा बळी द्यायचा होता. मात्र, बळी देण्यासाठी कुणीही समोर येत नव्हतं. पण इरावन स्वेच्छेनं बळी जाण्यास तयार झाला.

मात्र, त्यानं एक अट ठेवली की, बळी देण्याआधी त्याचं लग्न लावून देण्यात यावं. त्याच्या या मागणीमुळं पांडव अडचणीत सापडले. कारण प्रश्न हा होता की, कोणतीही राजकुमारी एका दिवसासाठी लग्नास कशी तयार होईल?

श्रीकृष्णानं मोहिनीच्या रूपात केलं लग्न

ही समस्या दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण समोर आले. त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि इरावनसोबत विवाह केला. त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा इरावनचा बळी देण्यात आला, तेव्हा मोहिनी रूपी श्रीकृष्ण विधवा झाले. त्यानंतर सगळ्या रितीरिवाजांचं पालन करत शोक व्यक्त केला. याच घटनेच्या आठवणीत किन्नर समाज इरावनला आपला देवता मानतात आणि दर वर्षातील एका दिवसाठी त्याच्यासोबत लग्न करतात, दुसऱ्या दिवशी विधवेचे रितीरिवाज पार पाडले जातात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके