शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:05 IST

अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.

Viral News : किन्नर सुद्धा इतर सामान्य लोकांप्रमाणेच मनुष्य असतात. मात्र, समाजातीलच लोक त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. किन्नर लोकांचं जगणं इतर लोकांपेक्षा वेगळं असतं. नैसर्गिकरित्या त्यांचं शरीर जरा वेगळं असतं. पण शेवटी ते मनुष्यच आहेत. समाज त्यांना स्वीकारत नसला तरी ते त्यांच्या त्यांच्या विश्वास आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतात. अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.

देवासोबत लग्न आणि विधवा होण्याची परंपरा

लोकांना वाटतं की, किन्नर लग्न करत नाहीत. पण असं नाहीये. ते लग्न करतात, पण केवळ एका दिवसासाठी. किन्नर अर्जुन आणि नाग कन्या उलूपीचा पुत्र इरावनसोबत लग्न करतात. यादरम्यान ते मोठा उत्सव साजरा करतात आणि नाच-गाणंही करतात. या विवाहानंतर इरावन देवाची मूर्ती तोडली जाते. ज्यानंतर किन्नरांना विधवा मानलं जातं. त्यानंतर ते हिंदू-रितीरिवाजानुसार विधवेची वस्त्र धारण करतात आणि एक सामान्य जीवन जगू लागतात.

महाभारताशी निगडीत परंपरा

किन्नरांच्या या विवाह परंपरेची मुळं महाभारत काळाशी जुळलेली आहेत. कथेनुसार, महाभारत युद्धाआधी पांडवांनी मां कालीची पूजा केली. ज्यात एका अटीनुसार, एका राजकुमाराचा बळी द्यायचा होता. मात्र, बळी देण्यासाठी कुणीही समोर येत नव्हतं. पण इरावन स्वेच्छेनं बळी जाण्यास तयार झाला.

मात्र, त्यानं एक अट ठेवली की, बळी देण्याआधी त्याचं लग्न लावून देण्यात यावं. त्याच्या या मागणीमुळं पांडव अडचणीत सापडले. कारण प्रश्न हा होता की, कोणतीही राजकुमारी एका दिवसासाठी लग्नास कशी तयार होईल?

श्रीकृष्णानं मोहिनीच्या रूपात केलं लग्न

ही समस्या दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण समोर आले. त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि इरावनसोबत विवाह केला. त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा इरावनचा बळी देण्यात आला, तेव्हा मोहिनी रूपी श्रीकृष्ण विधवा झाले. त्यानंतर सगळ्या रितीरिवाजांचं पालन करत शोक व्यक्त केला. याच घटनेच्या आठवणीत किन्नर समाज इरावनला आपला देवता मानतात आणि दर वर्षातील एका दिवसाठी त्याच्यासोबत लग्न करतात, दुसऱ्या दिवशी विधवेचे रितीरिवाज पार पाडले जातात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके