शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:50 IST

अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...

रंगा आणि बिल्ला ही नावं कितीतरी सिनेमांमध्ये तुम्ही ऐकली असतील. साधारण ७०-८० च्या दशकातील बहुतेक व्हिलन किंवा साइड व्हिलनची नावं हीच राहत होती. पण ही नावं इतकी का वापरली जायची? तुम्हीही अनेकदा ही नावं ऐकली असतील. मुळात ही काही काल्पनिक नावं नाहीत. तर ७० च्या दशकातील हे दोघे भारतातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक होते. अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...

६० च्या दशकात छोट्या-मोठ्या चोरी करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारे रंगा(कुलजीत सिंह आणि बिल्ला(जसबीर सिंह) ७० च्या काळापर्यंत कुख्यात गुन्हेगार झाले होते. १९७८ मध्ये या दोघांनी अपहरण आणि हत्येचा एक असा गुन्हा केला होता की, त्यावेळी देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई सुद्धा टेंशनमध्ये आले होते. हा गुन्हा इतका मोठा होता की, देशभरात एकच चर्चा रंगली होती. देशच नाही तर परदेशातही यांची चर्चा होत होती.

२६ ऑगस्ट १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाने भारतीय नौसेनेचे अधिकारी मदन मोहन चोपडा यांची मुले गीता(१६) आणि संजय(१४) यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. अपहरणाच्या २ दिवसांनंतर २८ ऑगस्टला दोन्ही मुलांचे मृतहेद आढळून आले होते.

पैशांसाठी केलं होतं अपहरण

रंगा आणि बिल्लाने नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या एका मुलीचं आणि एका मुलीचं अपहरण खंडणीसाठी केलं होतं. पण जेव्हा रंगा आणि बिल्ला यांना कळाले की, या मुलांचे वडील नेव्हीमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी दोघांची हत्या केली.

दिल्लीसहीत देश हादरला होता

नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या मुलांच्या हत्याकांडामुळे दिल्लीसहीत देशाला धक्का बसला होता. त्यावेळी या घटनेची चर्चा परदेशातही पोहोचली होती. त्यानंतर लोकांमध्ये रंगा आणि बिल्लाची दहशत निर्माण झाली होती.

पंतप्रधानांनी दिले होते चौकशीचे आदेश

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना जेव्हा या घटनेबाबत माहीत मिळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. कारण देशातील एका मोठ्या सैन्य अधिकाऱ्याही ती मुलं होती. त्यावेळी देशात लोकांमध्ये संताप बघायला मिळाला होता. रस्त्यांवर आणि संसदेत मोरारजी देसाई सरकारवर टिका झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई यांनीच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

नंतर पोलिसांनी मोठ्या मेहनतीनंतर ८ सप्टेंबर १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाला आग्र्याहून अटक केली. दोघेही आग्र्यात कालका मेलच्या त्या डब्यात चढले होते. हा डबा सैनिकांसाठी आरक्षित होता. यातीलच एका सैनिकाने पेपरमधील फोटोवरून दोघांना ओळखलं होतं. नंतर चार वर्ष दोघांची कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर १९८२ मध्ये रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स