शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

कावळेही सूड घेतात? मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष लक्षात ठेवतात चेहरा...पाहा काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:07 IST

Do crows take revenge : एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.

Do crows take revenge : नागाला जर एखाद्या मनुष्यांनं मारलं तर नागिणीच्या डोळ्यात त्याचा चेहरा छापला जातो आणि नंतर नागिण आपला सूड घेते अशी एक मान्यता काही लोकांमध्ये असते. तसेच एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला मनुष्यांनी त्रास दिला तर ते प्राणी किंवा पक्षी त्या व्यक्तीचा सूड घेतात, असंही अनेकांना वाटतं. पण याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. तर काही लोकांचा यावर विश्वास नाही.

मात्र, एका वैज्ञानिकाने असा दावा केलाय ज्याबाबत वाचून तुम्ही थक्क व्हाल. एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.

'डेली स्टार'च्या एका वृत्तानुसार, कावळेही सूड घेतात. हा दावा बर्ड्स एक्सपर्टने केला आहे. त्यांचं मत आहे की, जर कावळ्याचं वैर मनुष्यासोबत झालं तर ते साधारण १७ वर्ष लक्षात ठेवतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करत राहतात. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्रोफेसर जॉन मारजलुफ एक एन्वायरोमेंटल सायंटिस्ट आहेत. 

कावळेही घेतात सूड

२००६ मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. ज्याद्वारे टेस्ट करण्यात आलं की, कावळेही सूड घेतात का? त्यांना एक मास्क चेहऱ्यावर लावला आणि मग ७ कावळ्यांना एका जाळ्यात अडकवलं. पक्ष्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना बॅंड बांधण्यात आले होते. काही वेळाने त्यांनी कावळ्यांना काहीच इजा न करता सोडून दिलं. जॉनने दावा केला की, सोडून दिल्यानंतरही कावळ्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. जेव्हाही ते मास्क लावून यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून निघत होते, तेव्हा कावळे त्यांच्यावर हल्ला करत होते.

१७ वर्ष कावळ्यांनी ठेवलं लक्षात

अभ्यासकांना रिसर्चमध्ये आढळून आलं की, पक्ष्यांच्या मेंदुमध्येही एक असा भाग असतो स्तनधारींच्या एमिगडाला सोबत मिळता जुळता असतो. एमिगडाला मेंदूचा असा भाग असतो जो इमोशन्सची प्रोसेस करतो. त्यांना आश्चर्य याचं वाटलं की, पक्षी मनुष्यांच्या छोट्या छोट्या वागण्यांकडेही लक्ष देतात. इतकंच नाही तर ते चेहरेही लक्षात ठेवतात. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे कावळ्यांच्या त्या थव्यामधील इतर कावळेही त्यांच्यावर हल्ला करू लागले होते. हे साधारण ७ वर्ष असंच चाललं.

२०१३ नंतर कावळ्यांची हिंसा कमी होत गेली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा ते फिरायला निघाले तेव्हा या घटनेला १७ वर्षे झाले होते. तेव्हा पहिल्यांदा असं झालं की, ते मास्क घालून असूनही कावळ्यांनी त्यांना बघून ना आवाज केला ना त्यांच्यावर हल्ला केला. आता प्रोफेसर जॉन त्यांचा शोध प्रकाशित करण्याचा प्लान करत आहेत.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके