शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:10 IST

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही.

भारतात बरीच गावं अशी आहेत ज्यांच्या वैशिष्ट्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. जम्मूमधील एक गाव असे आहे. ज्याठिकाणी हजारोंची लोकसंख्या आहे परंतु या गावातील निम्मी लोकसंख्या ना बोलू शकते ना त्यांना काही ऐकायला येते. या गावातील बहुतांश लहान मुले मुक-बधीर आहेत.गावातील प्रत्येक कुटुंबाची ही समस्या आहे. गावात निम्म्याहून अधिक लोकांना बोलता येत नाही. काहींच्या मते, गावाला हा शाप असल्याचं बोललं जाते. जाणून घ्या नेमकं या गावची काय स्थिती आहे? या गावात असे का होते? ज्यामुळे याठिकाणी जन्मलेली मुलं मूक बधीर होतात

जम्मूतील हे गाव आहे ज्याठिकाणी गावातील अर्धी लोकसंख्या बोलणे आणि ऐकणे असक्षम आहे. या गावाचं नाव डडकई असं आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रवाहपासून १०५ किमी. अंतरावर एका पर्वतावर हे गाव वसलेले आहे. डीडब्ल्यू रिपोर्टनुसार, या गावात १०५ कुटुंब राहतात त्यातील ७८ हून अधिक लोकांना काही ऐकायला आणि बोलायला येत नाही. त्यामुळे आता हे गाव सन्नाटा गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील अनेक कुटुंबात जन्मलेली मुलं मूक-बधीर आहेत.

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ज्या कुटुंबात मूक बधीर असतील तिथे लग्न करण्याची शक्यता कमी आहे. कारण अनुवांशिक आजार असल्याने तो मुलांमध्ये पसरत असल्याची समज लोकांमध्ये आहे. या गावात एक बधीर मुलगा जन्माला आलेलं पहिलं प्रकरण १९०१ मध्ये समोर आलं होते. १९९० मध्ये याठिकाणी ४६ बधीर लोकं होती. या गावात असलेल्या आजारामुळे भीतीपोटी काहीजण पंजाब आणि देशातील अन्य भागात वास्तव्यास गेली.

वैज्ञानिकांच्या मते, यामागे अनुवांशिक दोष आहे. हा आजार विविध समुदायातील विवाहामुळे जास्त पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोकं मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत आहेत. याठिकाणचे लोकं आंतरजातीय विवाहही जास्त करतात. त्यामुळे ही समस्या असल्याचं बोललं जाते. परंतु गावातील काही कथित कहानी असल्याचं बोलतात आणि या आजाराला शाप असल्याचं सांगतात. या गावाला भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सनं दत्तक घेतले आहे. लष्कर याठिकाणी कपडे, खाद्य आणि आरोग्य सुविधा यासारख्या गोष्टी गावातील घरोघरी जाऊन पुरवत असतात

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान