शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:10 IST

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही.

भारतात बरीच गावं अशी आहेत ज्यांच्या वैशिष्ट्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. जम्मूमधील एक गाव असे आहे. ज्याठिकाणी हजारोंची लोकसंख्या आहे परंतु या गावातील निम्मी लोकसंख्या ना बोलू शकते ना त्यांना काही ऐकायला येते. या गावातील बहुतांश लहान मुले मुक-बधीर आहेत.गावातील प्रत्येक कुटुंबाची ही समस्या आहे. गावात निम्म्याहून अधिक लोकांना बोलता येत नाही. काहींच्या मते, गावाला हा शाप असल्याचं बोललं जाते. जाणून घ्या नेमकं या गावची काय स्थिती आहे? या गावात असे का होते? ज्यामुळे याठिकाणी जन्मलेली मुलं मूक बधीर होतात

जम्मूतील हे गाव आहे ज्याठिकाणी गावातील अर्धी लोकसंख्या बोलणे आणि ऐकणे असक्षम आहे. या गावाचं नाव डडकई असं आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रवाहपासून १०५ किमी. अंतरावर एका पर्वतावर हे गाव वसलेले आहे. डीडब्ल्यू रिपोर्टनुसार, या गावात १०५ कुटुंब राहतात त्यातील ७८ हून अधिक लोकांना काही ऐकायला आणि बोलायला येत नाही. त्यामुळे आता हे गाव सन्नाटा गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील अनेक कुटुंबात जन्मलेली मुलं मूक-बधीर आहेत.

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ज्या कुटुंबात मूक बधीर असतील तिथे लग्न करण्याची शक्यता कमी आहे. कारण अनुवांशिक आजार असल्याने तो मुलांमध्ये पसरत असल्याची समज लोकांमध्ये आहे. या गावात एक बधीर मुलगा जन्माला आलेलं पहिलं प्रकरण १९०१ मध्ये समोर आलं होते. १९९० मध्ये याठिकाणी ४६ बधीर लोकं होती. या गावात असलेल्या आजारामुळे भीतीपोटी काहीजण पंजाब आणि देशातील अन्य भागात वास्तव्यास गेली.

वैज्ञानिकांच्या मते, यामागे अनुवांशिक दोष आहे. हा आजार विविध समुदायातील विवाहामुळे जास्त पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोकं मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत आहेत. याठिकाणचे लोकं आंतरजातीय विवाहही जास्त करतात. त्यामुळे ही समस्या असल्याचं बोललं जाते. परंतु गावातील काही कथित कहानी असल्याचं बोलतात आणि या आजाराला शाप असल्याचं सांगतात. या गावाला भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सनं दत्तक घेतले आहे. लष्कर याठिकाणी कपडे, खाद्य आणि आरोग्य सुविधा यासारख्या गोष्टी गावातील घरोघरी जाऊन पुरवत असतात

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान