शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:10 IST

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही.

भारतात बरीच गावं अशी आहेत ज्यांच्या वैशिष्ट्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. जम्मूमधील एक गाव असे आहे. ज्याठिकाणी हजारोंची लोकसंख्या आहे परंतु या गावातील निम्मी लोकसंख्या ना बोलू शकते ना त्यांना काही ऐकायला येते. या गावातील बहुतांश लहान मुले मुक-बधीर आहेत.गावातील प्रत्येक कुटुंबाची ही समस्या आहे. गावात निम्म्याहून अधिक लोकांना बोलता येत नाही. काहींच्या मते, गावाला हा शाप असल्याचं बोललं जाते. जाणून घ्या नेमकं या गावची काय स्थिती आहे? या गावात असे का होते? ज्यामुळे याठिकाणी जन्मलेली मुलं मूक बधीर होतात

जम्मूतील हे गाव आहे ज्याठिकाणी गावातील अर्धी लोकसंख्या बोलणे आणि ऐकणे असक्षम आहे. या गावाचं नाव डडकई असं आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रवाहपासून १०५ किमी. अंतरावर एका पर्वतावर हे गाव वसलेले आहे. डीडब्ल्यू रिपोर्टनुसार, या गावात १०५ कुटुंब राहतात त्यातील ७८ हून अधिक लोकांना काही ऐकायला आणि बोलायला येत नाही. त्यामुळे आता हे गाव सन्नाटा गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील अनेक कुटुंबात जन्मलेली मुलं मूक-बधीर आहेत.

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ज्या कुटुंबात मूक बधीर असतील तिथे लग्न करण्याची शक्यता कमी आहे. कारण अनुवांशिक आजार असल्याने तो मुलांमध्ये पसरत असल्याची समज लोकांमध्ये आहे. या गावात एक बधीर मुलगा जन्माला आलेलं पहिलं प्रकरण १९०१ मध्ये समोर आलं होते. १९९० मध्ये याठिकाणी ४६ बधीर लोकं होती. या गावात असलेल्या आजारामुळे भीतीपोटी काहीजण पंजाब आणि देशातील अन्य भागात वास्तव्यास गेली.

वैज्ञानिकांच्या मते, यामागे अनुवांशिक दोष आहे. हा आजार विविध समुदायातील विवाहामुळे जास्त पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोकं मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत आहेत. याठिकाणचे लोकं आंतरजातीय विवाहही जास्त करतात. त्यामुळे ही समस्या असल्याचं बोललं जाते. परंतु गावातील काही कथित कहानी असल्याचं बोलतात आणि या आजाराला शाप असल्याचं सांगतात. या गावाला भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सनं दत्तक घेतले आहे. लष्कर याठिकाणी कपडे, खाद्य आणि आरोग्य सुविधा यासारख्या गोष्टी गावातील घरोघरी जाऊन पुरवत असतात

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान