शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:10 IST

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही.

भारतात बरीच गावं अशी आहेत ज्यांच्या वैशिष्ट्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. जम्मूमधील एक गाव असे आहे. ज्याठिकाणी हजारोंची लोकसंख्या आहे परंतु या गावातील निम्मी लोकसंख्या ना बोलू शकते ना त्यांना काही ऐकायला येते. या गावातील बहुतांश लहान मुले मुक-बधीर आहेत.गावातील प्रत्येक कुटुंबाची ही समस्या आहे. गावात निम्म्याहून अधिक लोकांना बोलता येत नाही. काहींच्या मते, गावाला हा शाप असल्याचं बोललं जाते. जाणून घ्या नेमकं या गावची काय स्थिती आहे? या गावात असे का होते? ज्यामुळे याठिकाणी जन्मलेली मुलं मूक बधीर होतात

जम्मूतील हे गाव आहे ज्याठिकाणी गावातील अर्धी लोकसंख्या बोलणे आणि ऐकणे असक्षम आहे. या गावाचं नाव डडकई असं आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रवाहपासून १०५ किमी. अंतरावर एका पर्वतावर हे गाव वसलेले आहे. डीडब्ल्यू रिपोर्टनुसार, या गावात १०५ कुटुंब राहतात त्यातील ७८ हून अधिक लोकांना काही ऐकायला आणि बोलायला येत नाही. त्यामुळे आता हे गाव सन्नाटा गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील अनेक कुटुंबात जन्मलेली मुलं मूक-बधीर आहेत.

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ज्या कुटुंबात मूक बधीर असतील तिथे लग्न करण्याची शक्यता कमी आहे. कारण अनुवांशिक आजार असल्याने तो मुलांमध्ये पसरत असल्याची समज लोकांमध्ये आहे. या गावात एक बधीर मुलगा जन्माला आलेलं पहिलं प्रकरण १९०१ मध्ये समोर आलं होते. १९९० मध्ये याठिकाणी ४६ बधीर लोकं होती. या गावात असलेल्या आजारामुळे भीतीपोटी काहीजण पंजाब आणि देशातील अन्य भागात वास्तव्यास गेली.

वैज्ञानिकांच्या मते, यामागे अनुवांशिक दोष आहे. हा आजार विविध समुदायातील विवाहामुळे जास्त पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोकं मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत आहेत. याठिकाणचे लोकं आंतरजातीय विवाहही जास्त करतात. त्यामुळे ही समस्या असल्याचं बोललं जाते. परंतु गावातील काही कथित कहानी असल्याचं बोलतात आणि या आजाराला शाप असल्याचं सांगतात. या गावाला भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सनं दत्तक घेतले आहे. लष्कर याठिकाणी कपडे, खाद्य आणि आरोग्य सुविधा यासारख्या गोष्टी गावातील घरोघरी जाऊन पुरवत असतात

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान