शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सावळागोंधळ! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर गावात फिरलं; पण नवरीचं घर सापडलचं नाही

By प्रविण मरगळे | Updated: December 14, 2020 11:18 IST

घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं

वाराणसी – सध्या उत्तर प्रदेशात लग्नाचा सीझन आहे. अशातच राज्यातील आजमगढमध्ये अजबगजब घटना पाहायला मिळाली आहे. लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला मोठा धक्का बसला. आजमगढमध्ये राहणाऱ्या एका युवकाचं लग्न १० डिसेंबर रोजी मऊ जिल्ह्यातील एका युवतीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या रात्री नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन मऊ जिल्ह्यातील होणाऱ्या नवरीच्या गावात गेला, परंतु संपूर्ण रात्रभर फिरले तरीही वऱ्हाडाला नवरीचं घर सापडलं नाही वा तिच्या कुटुंबाची कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मजबुरीनं संपूर्ण वऱ्हाडाला निराश होऊन माघारी परतावं लागलं.

घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारामुळे खळबळ माजली, महिलेचा दावा आहे की, नवरीच्या कुटुंबाने तिचीही फसवणूक केली आहे. या प्रकारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी शमशेर यादव म्हणाले की, नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न ठरवणाऱ्या महिलेच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही दोघांनाही समस्या सोडवण्याची संधी दिली, शनिवारी रात्री दोघांमध्ये समझौता झाला आणि नवरदेवाच्या कुटुंबाने महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

नवरदेवाचे कुटुंब छतवारा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आलं, या महिलेने मुलाचं लग्न ठरवण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर मऊ जिल्ह्यातील मुलीचं स्थळ पाहण्यात आलं, दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार झालं, मात्र लग्नाआधी मुलाचं कुटुंब मुलीच्या घरी न गेल्याने सगळा गोंधळ उडाला. लग्नाची तारीख ठरली, मुलाच्या कुटुंबाने मुलीकडील मंडळींना बँडबाजा आणि अन्य कार्यासाठी २० हजार रुपये दिले होते.

टॅग्स :Policeपोलिस