शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावळागोंधळ! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर गावात फिरलं; पण नवरीचं घर सापडलचं नाही

By प्रविण मरगळे | Updated: December 14, 2020 11:18 IST

घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं

वाराणसी – सध्या उत्तर प्रदेशात लग्नाचा सीझन आहे. अशातच राज्यातील आजमगढमध्ये अजबगजब घटना पाहायला मिळाली आहे. लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला मोठा धक्का बसला. आजमगढमध्ये राहणाऱ्या एका युवकाचं लग्न १० डिसेंबर रोजी मऊ जिल्ह्यातील एका युवतीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या रात्री नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन मऊ जिल्ह्यातील होणाऱ्या नवरीच्या गावात गेला, परंतु संपूर्ण रात्रभर फिरले तरीही वऱ्हाडाला नवरीचं घर सापडलं नाही वा तिच्या कुटुंबाची कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मजबुरीनं संपूर्ण वऱ्हाडाला निराश होऊन माघारी परतावं लागलं.

घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारामुळे खळबळ माजली, महिलेचा दावा आहे की, नवरीच्या कुटुंबाने तिचीही फसवणूक केली आहे. या प्रकारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी शमशेर यादव म्हणाले की, नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न ठरवणाऱ्या महिलेच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही दोघांनाही समस्या सोडवण्याची संधी दिली, शनिवारी रात्री दोघांमध्ये समझौता झाला आणि नवरदेवाच्या कुटुंबाने महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

नवरदेवाचे कुटुंब छतवारा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आलं, या महिलेने मुलाचं लग्न ठरवण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर मऊ जिल्ह्यातील मुलीचं स्थळ पाहण्यात आलं, दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार झालं, मात्र लग्नाआधी मुलाचं कुटुंब मुलीच्या घरी न गेल्याने सगळा गोंधळ उडाला. लग्नाची तारीख ठरली, मुलाच्या कुटुंबाने मुलीकडील मंडळींना बँडबाजा आणि अन्य कार्यासाठी २० हजार रुपये दिले होते.

टॅग्स :Policeपोलिस