शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हनीमुनच्या दिवशी झालं असं काही की बायकोने विचारलं, मी लग्नच का केलं तुझ्याशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 18:44 IST

नवीन लग्न असतानाच कोणच्या बायकोवर त्याचं चुकीचं इम्प्रेशन पडलं तर? मग बायकोला गैरसमज होणारच. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत असंच काहीसं घडलं आहे.

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. लग्न झाल्यानंतर एकमेकांना ओळखण्यासाठी आणि आनंदाचे क्षण जगण्यासाठी बरेच लोक हनीमून जातात. परंतु विचार करा जर हाच तुमचा दिवस खराब झाला किंवा नवीन लग्न असतानाच कोणच्या बायकोवर त्याचं चुकीचं इम्प्रेशन पडलं तर? मग बायकोला गैरसमज होणारच. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत असंच काहीसं घडलं आहे.

आता जरा विचार करा, या काळात तुम्हाला ऑफिसमधील काही महत्वाचे काम करण्यासाठी बॉसने तुम्हाला पुन्हा बोलवलं तर? नक्कीच तुम्ही खूप दुःखी व्हाल आणि तुमचा जोडीदारही निराश होईल.  अमेरिकेत राहणार्‍या एका व्यक्तीने Reddit वर सांगितले की, या वर्षी जानेवारीमध्ये तो हनीमून साजरा करण्यासाठी कंबोडियाला गेला होता. इतक्यात ऑफिसमधून त्याला बॉसचा फोन आला आणि त्यांनी काही तातडीच्या कामासाठी एक दिवस त्याला ऑफिसला यायला सांगितलं. हे ऐकून तो चिडला, कारण तो हनीमूनसाठी सुट्टी घेऊनच कंबोडियाला आला होता. ज्यामुळे तो एका दिवसासाठी इतक्या लांबून येऊ शकत नव्हता.

Reddit पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने लिहिले की, 'मी नुकतेच लग्न केले आहे आणि कंबोडियामध्ये माझ्या हनीमूनसाठी गेलो होतो. मला आणि माझ्या पत्नीला अनेकदा कामातून सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे अनेक प्रयत्नानंतर आम्हाला या सुट्ट्या मिळाल्या होत्या, ज्या आपल्यासाठी खास होत्या. मी १ जानेवारीला रजेसाठी अर्ज केला होता, जो दुसऱ्याच दिवशी बॉसने मंजूर केला होता.'

त्या व्यक्तीने पुढे लिहिले की, 'परंतु असे असून देखील माझा बॉस आता मला हनीमूनच्या तिसऱ्या दिवशी क्लायंटच्या पिच मीटिंगला उपस्थित राहण्यास सांगत आहे. बॉसने त्याला सांगितले की, ही मिटींग खूप महत्त्वाची आहे आणि त्याला फक्त एका दिवसासाठी माझी गरज आहे. त्याला उत्तर देताना मी म्हणालो की हा माझा हनिमूनचा काळ आहे आणि मी कोणत्याही अटीवर तिथे येऊ शकत नाही. यावर बॉस म्हणाला, की ही फक्त एका दिवसाची बाब आहे आणि जर या महत्वाच्या बैठकीसाठी मी आलो नाही तर तो माझ्याबरोबर एक टीम म्हणून पुढे जाऊ शकणार नाही.'

या संपूर्ण प्रकरणावर पत्नीशी बोलल्यानंतर आता हा व्यक्ती दोन कठोर निर्णयांमध्ये अडकला आहे. त्याला भीती वाटते की एकतर बॉस त्याला काढून टाकेल किंवा त्याला हनीमूनला पुन्हा प्लॅन करावा लागेल. परंतु दुसरीकडे, तो जेव्हा त्याच्या बायकोला यासंदर्भात विचारतो, तेव्हा त्याच्या बायकोला, या सगळ्या प्रकारामुळे आपण लग्नच का केलं हा प्रश्न पडला आहे. सहाजिकच ती खूप रागवली असणार यात काही शंका नाही. परंतु आता बायको आणि नोकरी या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये हा व्यक्ती पूरता फसला असणार हे नक्की. पुढे त्याचं काय झालं हे काही कळलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके