शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अजब प्यार की गजब कहानी! 2 मुलांची आई पडली नणंदेच्या प्रेमात; गुपचूप केलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 10:31 IST

एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं.

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. ही घटना रोसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढरहरा गावातील असून, वहिनीने आपल्या नणंदेसोबत लग्न केलं आणि तिच्या अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. आधी महिला एएसआयने वहिनीला मुलगा समजून तिची व्यथा ऐकायला सुरुवात केली, पण सत्य समजताच त्यांनाही धक्का बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेली महिला हळूहळू आपल्याच नणंदेच्या प्रेमात पडली आणि मग दोघींनी लग्न केलं. याची माहिती मिळताच नणंदेचे नातेवाईक तिला तेथून घेऊन गेले. यानंतर वहिनीने नणंदेच्या नातेवाईकांवर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

2013 मध्ये शुक्ला देवीचा विवाह ढरहरा गावात राहणाऱ्या प्रमोदसोबत झाला होता. दरम्यान, ती दोन मुलांची आई देखील झाली, परंतु याच दरम्यान सुकला तिची लहान नणंद सोनीच्या प्रेमात पडली. सुकला मुलासारखी राहू लागली आणि पाच महिन्यांपूर्वी तिने नणंदेसोबत लग्न केलं. दोघीही पती-पत्नीसारखे वैवाहिक जीवन जगू लागले. सुकला यांच्या पतीला ही बाब कळताच त्यांनी दोघींचीही संमती असल्याने कोणताही आक्षेप घेतला नाही. 

सुकला यांचा आरोप आहे की, शुक्रवारी दुपारी त्यांची मोठी वहिनी 10-15 जणांसह आली आणि पत्नी सोनी कुमारीला घेऊन गेली. सुकला यांनी आपली मोठी वहिनी उषा देवी हिच्यावर पत्नी सोनीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत रोसदा पोलीस ठाण्याचे अधिकारी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, सुकला नावाच्या महिलेने अर्ज दिला आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न