शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 19:23 IST

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलं तर नवलच वाटतं.

ठळक मुद्देभारताला अंधश्रद्धेने पोखरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.काही अशा अंधश्रध्दा उच्चभ्रू लोकांकडून मानल्या जातात की त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कित्येक हॉटेल्स किंवा मोठ्या इमारतींमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने टाळली जाते.

मुंबई- भारताला अंधश्रद्धेने पोखरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण भारतातल्या आणि मुख्यत्वे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अशा काही गोष्टी उच्चभ्रू लोकांकडून मानल्या जातात की त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुंबईतील कित्येक श्रीमंत हॉटेल्समध्ये १३ वा माळाच नाही. म्हणजे या हॉटेलांनी आकाशाला गवसणी घातली असली तरी १३ वा माळा स्किप करून थेट १४ वा माळा यांनी बनवला आहे.

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातंल तर नवलच वाटतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, १३ वा माळा न बांधण्याचा किंवा १२ व्या माळ्यानंतर थेट १४ माळा ठेवण्यामागे हॉटेल मालकांची आणि वास्तूविशारदांची काय भूमिका असू शकते. असं म्हणतात की १३ हा क्रमांक अशुभ मानला जातो. म्हणून कित्येक हॉटेल्स किंवा मोठ्या इमारतींमध्ये १३ क्रमांचा माळाच नसतो.

दि ट्रिडेंट हॉटेल, नरिमन पॉईंट

नरिमन पाँईंटमधल्या दि ट्रिडेंट हॉटेलमध्ये १३ वा माळा नाहीए. त्याचं कारण म्हणजे १३ क्रमांक अशुभ मानला जातो. त्याचप्रमाणे १३ वा शुक्रवार अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे या हॉटेलचा मालक ट्रिसकायडेकाफोबिया या तत्वावर विश्वास ठेवतो. ट्रिसकायडेकाफोबिया म्हणजे १३ क्रमांकाची भीती असणे. ग्रीक भाषेपासून हा शब्द तयार करण्यात अाला अाहे. ट्रिस म्हणेज १३, काय म्हणजे आणि, डेका म्हणजे १० व फोबिया म्हणजे भीती याचा अर्थ १३ आणि १० क्रमांकाची भीती असणं. असं म्हणतात की या हॉटेलमध्ये १३ व्या माळ्यावर अनेक पर्यटकांना विचित्र आवाज येत होते. शिवाय तेथील कर्मचाऱ्यांनाही १३ व्या माळ्यावर भयानक काहीतरी असल्याचं सतत जाणवायचं, म्हणून या इमारतीतून १३ क्रमांक काढून थेट १४ वा क्रमांक देण्यात आला.

हॉचेस्ट हाऊस, नरिमन पाँईंट

या हॉटेलमधील ग्राहकांना १३व्या माळ्यावर अनेक विचित्र आवाज येत असल्याचे अनुभव आले. म्हणून यांनीही १३ वा माळा स्किप केला असं म्हटलं जातं.

मेकर चेंबर्स ४

मेकर चेंबर्स हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की, तेराव्या माळ्यावरील लाईट्स आपोआप चालू बंद होतात. त्या लाईट्स तेथे सतत चालू ठेवण्याचीच सेटींग करण्यात आली असली तरी त्या बंद होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या माळ्याविषयी सतत भीती असते.

या इमारती फक्त मुंबईतीलच झाल्या. पण भारतातही अशा अनेक इमारती आहेत जिथे अशाप्रकारची अंधश्रद्धा पाळली जाते. माणसं आभाळाला टेकतील अशा इमारती बांधतात पण अशा समजुतींमुळे त्यांचे विचार नेहमीच खालच्या पायरीवरच राहतात असं म्हणायला हरकत नाही.

सौजन्य - www.rvcj.com

टॅग्स :hotelहॉटेलMumbaiमुंबई