शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

अरे बापरे! तरुणीला आहे 'हा' अजब आजार; घाम, अश्रूंपासून मोठा धोका, पाण्याच्या थेंबाने जळते त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 08:37 IST

Abbie Plummer : पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. पण तुम्हाला जर कोणी पाण्याचा एक थेंब हा शरीरासाठी घातक असल्याचं सांगितलं. तर तुमचा सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एक तरुणी अशाच एक भयंकर आजाराने त्रस्त आहे. स्वतःचा घाम, अश्रू, अंघोळ या गोष्टी तिच्यासाठी जीवघेण्या ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. तरुणीला पाण्यामुळे इतका त्रास होते की पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

यूकेतील केंटमध्ये राहणारी 19 वर्षीय तरुणाचं नाव एब्बी प्लम्मर (Abbie Plummer) असं आहे. तिची त्वचा इतकी संवेदनशील आहे की पाण्याच्या संपर्कात येताच तिची त्वचा जळते. पाणी लागताच तिच्या त्वचेवर मोठ मोठे फोड येतात. अगदी घाम आणि डोळ्यातील अश्रूंमुळेही तिला हा त्रास होतो. ज्यामुले तिला डोळ्यातील पाणी रोखावं लागतं. घाम येताच तिचा घाम एसिडमध्ये बदलतो आणि तिची त्वचा जळते. पावसाळ्यातही ती घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ती पाण्यापासून दूर राहते. एब्बी या दुर्मिळ आजाराबाबत विचार करते तेव्हा तिला स्वत: बद्दलच फार वाईट वाटत आणि रडू येतं. पण अश्रू आल्याने तिचा त्रास हा आणखी वाढतो. 

पाण्याचे काही थेंबही शरीरावर जखमा करून जातात

अश्रू सोबतच तिला घामामुळे देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात थोडी जरी वाढ झाली की ती तिच्यासाठी खूप मोठी शिक्षा असते. पावसाळ्यातही अशाच काहीसा प्रकार आहे. पाण्याचे काही थेंबही तिच्या शरीरावर जखमा करून जातात. तिने काही दिवसांपूर्वी आपल्याला असलेल्या या त्रासाची लोकांना माहिती दिली आहे. एब्बीने दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली तिला त्वचेची समस्या सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की कोणत्या शाम्पूमुळे तिला ही समस्या झाली असावी. तिला तशी औषधं देण्यात आली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. 

एब्बीला Aquagenic Urticaria असल्याचं निदान 

अखेर एब्बीला Aquagenic Urticaria  असल्याचं निदान झालं. ज्यामध्ये पाण्याची एलर्जी असते. पाणी साधं असो वा गरम त्याच्या संपर्कात येताच त्वचेवर त्याचे रिएक्शन होतात. एब्बीने सांगितलं, पाणी प्याल्याने तिला काही त्रास होत नाही. पाणी शरीरात गेल्यावर अशी काही रिएक्शन होत नाही. फक्त अंघोळ केल्यावर किंवा त्वचेवर पाणी पडल्यावर असं होतं. त्यामुळे 10 मिनिटांत पटापट अंघोळ करून ती लगेच आपलं शरीर सुकवते. पण त्यानंतरही तिच्या शरीरावर रॅशेस येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके