शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! तरुणीला आहे 'हा' अजब आजार; घाम, अश्रूंपासून मोठा धोका, पाण्याच्या थेंबाने जळते त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 08:37 IST

Abbie Plummer : पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. पण तुम्हाला जर कोणी पाण्याचा एक थेंब हा शरीरासाठी घातक असल्याचं सांगितलं. तर तुमचा सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एक तरुणी अशाच एक भयंकर आजाराने त्रस्त आहे. स्वतःचा घाम, अश्रू, अंघोळ या गोष्टी तिच्यासाठी जीवघेण्या ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. तरुणीला पाण्यामुळे इतका त्रास होते की पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

यूकेतील केंटमध्ये राहणारी 19 वर्षीय तरुणाचं नाव एब्बी प्लम्मर (Abbie Plummer) असं आहे. तिची त्वचा इतकी संवेदनशील आहे की पाण्याच्या संपर्कात येताच तिची त्वचा जळते. पाणी लागताच तिच्या त्वचेवर मोठ मोठे फोड येतात. अगदी घाम आणि डोळ्यातील अश्रूंमुळेही तिला हा त्रास होतो. ज्यामुले तिला डोळ्यातील पाणी रोखावं लागतं. घाम येताच तिचा घाम एसिडमध्ये बदलतो आणि तिची त्वचा जळते. पावसाळ्यातही ती घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ती पाण्यापासून दूर राहते. एब्बी या दुर्मिळ आजाराबाबत विचार करते तेव्हा तिला स्वत: बद्दलच फार वाईट वाटत आणि रडू येतं. पण अश्रू आल्याने तिचा त्रास हा आणखी वाढतो. 

पाण्याचे काही थेंबही शरीरावर जखमा करून जातात

अश्रू सोबतच तिला घामामुळे देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात थोडी जरी वाढ झाली की ती तिच्यासाठी खूप मोठी शिक्षा असते. पावसाळ्यातही अशाच काहीसा प्रकार आहे. पाण्याचे काही थेंबही तिच्या शरीरावर जखमा करून जातात. तिने काही दिवसांपूर्वी आपल्याला असलेल्या या त्रासाची लोकांना माहिती दिली आहे. एब्बीने दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली तिला त्वचेची समस्या सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की कोणत्या शाम्पूमुळे तिला ही समस्या झाली असावी. तिला तशी औषधं देण्यात आली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. 

एब्बीला Aquagenic Urticaria असल्याचं निदान 

अखेर एब्बीला Aquagenic Urticaria  असल्याचं निदान झालं. ज्यामध्ये पाण्याची एलर्जी असते. पाणी साधं असो वा गरम त्याच्या संपर्कात येताच त्वचेवर त्याचे रिएक्शन होतात. एब्बीने सांगितलं, पाणी प्याल्याने तिला काही त्रास होत नाही. पाणी शरीरात गेल्यावर अशी काही रिएक्शन होत नाही. फक्त अंघोळ केल्यावर किंवा त्वचेवर पाणी पडल्यावर असं होतं. त्यामुळे 10 मिनिटांत पटापट अंघोळ करून ती लगेच आपलं शरीर सुकवते. पण त्यानंतरही तिच्या शरीरावर रॅशेस येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके