शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : ‘गायरान’च्या अतिक्रमणासाठी दोन महिन्यांचा अल्टिमेटम! जिल्हाधिकारी नोटिसा बजावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:44 IST

जिल्ह्यासह राज्यातील गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश महसूल व वन विभागाने काढले आहेत.

कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यासह राज्यातील गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश महसुल व वन विभागाने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १५०२ गावांमधील अतिक्रमण काढण्यासाठी ६० दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला जाणार आहे. त्यानंतरही दखल न घेतल्यास प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तसेच या कारवाईचा खर्च संबंधित अतिक्रमणधारकाच्या नावे ‘महसुली’ थकबाकी म्हणून टाकला जाणार आहे.

महसूल व वनविभागाचे सहसचीव रमेश चव्हाण यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.दि.२७ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यासाठी राज्यभरातील अतिक्रमणधारकांसाठी नोटिस बजावण्यात येणार आहे. या नोटिसमधील तपशीलही राज्य शासनाने निश्चीत केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदारांना ४ आठवड्याच्या आत नोटिसा बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नोटिस बजावल्यानंतर संबंधिताने ६० दिवसांच्या आत अतिक्रमण काढणे सक्तीचे ठरणार  आहे.

तर खर्च अंगावर!

नोटिस मिळाल्यानंतरही ६० दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास त्याची दखल जिल्हा प्रशासन घेणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून कुठलीही सूचना वा नोटिस न देता अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडून ‘महसुली’ थकबाकी म्हणून वसुल केला जाणार आहे.