शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

बाबो! 16 वर्षांनी पुनर्जन्माचा दावा, गेल्या जन्मातील आई-वडिलांना 'त्याने' ओळखलं, मृत्यूचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:32 IST

एका 3 वर्षाच्या मुलाने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना ओळखलं आहे. तसेच त्याचं नाव मोहित असूनही तो आपलं नाव 'तोरण' असल्याचं सांगत आहे.

नवी दिल्ली - चित्रपट अथवा एखाद्या मालिकेमध्ये पुनर्जन्माच्या काही गोष्टी आपण नेहमीच पाहत असतो. पण खऱ्या आयुष्यात देखील पुनर्जन्म झाल्याचं कोणी सांगितलं तर सुरुवातीला आपला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. राजस्थानच्या झालावड जिल्ह्यातील खजूरी गावात अशीच एक घटना घडली आहे. येथील एका 3 वर्षाच्या मुलाने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना ओळखलं आहे. तसेच त्याचं नाव मोहित असूनही तो आपलं नाव 'तोरण' असल्याचं सांगत आहे. 16 वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू कसा झाला, याचा घटनाक्रमही त्याने अगदी बरोबर सांगितला आहे.

मुलाच्या आई-वडिलांना सुरुवातीला हे खरंच वाटलं नाही. त्यांनी मुलाच्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही. पण नंतर अनेक गोष्टी समोर आल्यावर त्यांनाही धक्काच बसला. सर्वत्र सध्या याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. जवळच्याच एका गावात 16 वर्षांपूर्वी तोरण नावाच्या मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना कळाली. त्यानुसार मोहितच्या आई वडिलांनी मोहितला तोरणच्या आई वडिलांची आणि इतर नातेवाईकांची भेट घडवून आणली. यावेळी मोहितने आपण तोरण असल्याचं सांगत आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना देखील ओळखलं आहे

मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षांपूर्वी मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलुखेडी कला येथे रस्त्याचं काम करणाऱ्या खजुरी येथील 25 वर्षीय तोरण कल्याणसिंग धाकड या तरुणाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तोरणच्या आई-वडिलांनी आपलं घर विकून ते मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यातील शंकरपुरा गावात (जामनेर) राहायला गेले. पण तोरणची आत्या नथिया बाई धाकड या खजुरीलाच राहत होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर मोहितचे आई वडील त्याला घेऊन नथियाबाई यांना भेटायला आले. यावेळी 3 वर्षांच्या मोहीतने आपल्या आत्याला पटकन ओळखलं. यानंतर आत्याने तोरणच्या पालकांना याची माहिती दिली. 

मोहितने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना देखील ओळखलं आहे. मोहित केवळ त्याचं नाव तोरण आहे, असं सांगत नाही, तर त्याच्या मागच्या जन्मातील मृत्यूची घटनाही त्याला माहीत आहे. या घटनेबाबत विचारल्यानंतर झालावाड मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कृष्णा मुरारी लोढा यांनी सांगितलं की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मेंदू मृत होतो. त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे नाहीशी होते. एखाद्या व्यक्तीचा जन्म नवीन मेंदू आणि नवीन शरीरासह होतो. मेमरी कधीही एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. कुटुंबातील सदस्यांचं किंवा इतर काही लोकांचं बोलणं त्या मुलानं ऐकलं असावं. त्यामुळे तोही असं बोलत असावा, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके