शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जलव्यवस्थापन बैठकीला जि.प. अध्यक्षच अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:08 IST

टंचाई बाबत अनास्था

जळगाव : संपूर्ण जिल्हा पाणी टंचाईने होरपळत असताना व ही टंचाई निवारार्थ आचारसंहिता शिथिल केलेली असतानाही ‘मिनीमंत्रालय’ असलेल्या जि.प.मध्ये टंचाईबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र गुुरुवारी दिसून आले. जलव्यवस्थापन बैठकीकडे खुद्द जि.प. अध्यक्षांनीच पाठ फिरविल्याने मुख्यमंत्र्याच्या संवादाबाबत किती गांभीर्य आहे, हेदेखील दिसून येते.गुरुवारी जि.प.मध्ये जलव्यवस्थापन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे जिल्ह्यातील टंचाई निवारार्थ उपाययोजना होणे अपेक्षित असताना खुद्द जि.प अध्यक्षांनी पाठ फिरविली तर सदस्यांनीदेखील बैठकीला येणे टाळले. अखेर उपाध्यक्षांनी सभा घेवून औपचारीकता पूर्ण केली.जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळात होरपळत असून जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत अधिकारी व सरपंचांकडून माहिती घेत टंचाई निवारार्थ अधिकाऱ्यांना आदेश करीत आहे. दुसरीकडे मात्र मिनीमंत्रालयात या टंचाईबाबत अनास्था दिसून येत आहे.जि.प. सदस्यांनी व्यक्त केला संतापजलव्यवस्थापन बैठकीस केवळ जि.प सदस्या पल्लवी सावकारे, जि.प सदस्य लालचंद पाटील उपस्थित होते. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असताना त्याचा आढावा घेण्यास अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना वेळ नाही, त्यामुळे पल्लवी सावकारे यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे मुख्यमंत्री मंत्रालयातून प्रत्येक जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी बैठका घेत असताना जि.प. अध्यक्षांंना मात्र जिल्ह्याच्या टंचाईचे गांभीर्य नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.अखेर दुपारी झाली सभासकाळी ११ वाजता जलव्यवस्थापन समितीची सभा होणार होती.मात्र पल्लवी सावकारे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता सभा घेत पाणीटंचाईचा आढावा घेतला. त्यावेळी सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे व अधिकारी उपस्थित होते. अध्यक्षांनी कालच सर्व सदस्यांना फोन करून जलव्यवस्थापनची सभा रद्द करण्यात आल्याचे कळविले होते. मात्र ऐनवेळेस ही सभा त्यांच्या अनुपस्थितीत घेण्यात आली.योजनेला दाखले मिळत नसल्याची तक्रारउपाध्यक्ष महाजन यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेले टँकर,अपूर्ण योजना तसेच तात्काळ राबविण्याच्या उपयोजना याबाबत सूचना केल्या. पल्लवी सावकारे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेला दाखले मिळत नसल्याची तक्रार केली. सुनसगावला बोअरवेल मंजुरीची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना बोअरवेल का मंजुर करण्यात आल्या नाही असा सवालही त्यांनीउपस्थितकेला. खडका व कंडारीचा प्रश्नसभेतमांडण्यातआला. यावेळी उपाध्यक्षांनी तत्काळ दखल घेण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव