शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

नशिराबादला जि.प.चे अधिकारी मोजणीविनाच माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:17 AM

नशिराबाद : नवीन प्लॉट एरियासह अन्य काॅलन्यांमधील गटारीचे व सांडपाणी लक्ष्मीनगरकडे नको, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही ...

नशिराबाद : नवीन प्लॉट एरियासह अन्य काॅलन्यांमधील गटारीचे व सांडपाणी लक्ष्मीनगरकडे नको, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही समांतर सुनसगाव रस्त्याच्या मार्गाने गटारी काढा. मात्र, त्यालाही शेतकऱ्यांच्या विरोध होत असल्यामुळे नेमके आता गटारी काढायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी या परिसरात गटारी बांधकामाच्या मोजमाप करण्याकरिता आले असताना, लक्ष्मीनगरातील नागरिकांनी त्यांना विरोध दर्शवून मोजमाप करू न देता माघारी पाठविले.

लक्ष्मीनगर परिसरात तीर्थक्षेत्र स्वामी समर्थ केंद्र आहे. या परिसरात दत्तनगर, द्वारकानगर यांच्यासह अन्य पाच ते सहा काॅलनीचे सांडपाणी, गटारीचे पाणी लक्ष्मीनगर परिसरात तुंबत असल्याने, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी इकडे नको, दुसरा मार्ग शोधा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांची बैठक घेऊन, त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बापू चौधरी, राहुल चौधरी, भूषण साळुंखे, नरेंद्र निकम, पिंटू पवार, रवींद्र लोहार, सोपान माळी यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.

समांतर गटारीची मागणी

सुनसगाव रोडला समांतर गटारी करा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मात्र, याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीपासून गटारीचे पाणी तापीच्या दिशेने जाते, त्यामुळे इकडे नवीन गटारी खोदू नका, असा पवित्रा शेतकरी वर्ग घेत आहे.

पंधरा लाख खर्चून गटारीचे काम

या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लागावा, म्हणून जिल्हा परिषदेकडून १० ते १५ लाख रुपयांच्या पक्क्या गटारी बांधकाम करण्यात येत आहे. लक्ष्मीनगर परिसरातून नैसर्गिक प्रवाह गटारीचा असल्यामुळे त्याच मार्गाने गटारी करण्याचे नियोजन आहे. त्या परिसरात सुमारे एक ते दीड मीटर आरसीसी ढापे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.