शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जि.प.चा टंचाई आराखडा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:10 PM

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; १३ लाखांचाच आराखडा सादर

सुशील देवकर जळगाव : जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा आराखडा सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला असून संभाव्य टंचाईचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. मागील वर्षी जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे टँकरच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज होता. मात्र आराखड्यात टँकरसाठी काहीच तरतूद केलेली नाहीे.फक्त १८ गावांसाठी १८ उपाययोजनाप्रारंभी आराखडा सुमारे २कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून सुमारे ३५६ टंचाई उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र जि.प.ने प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या १३ लाख ९० हजारांच्या टंचाई आराखड्यात केवळ अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यात १८ गावांमधील १८ विशेष नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रस्तावांचाच समावेश आहे. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण,आदी इतर कोणत्याही उपाययोजनांचा समावेश नाही. जिल्ह्णात जरी अतिवृष्टी झालेली असली तरीही अनेक तालुक्यांमधील काही ठरावीक भागात उन्हाळ्यात दरवर्षीच पाणीटंचाई जाणवत असते. मात्र त्याचा अंदाज न घेताच जि.प.ने टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी हा आराखडा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव