शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

युवकांनो नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 5:52 PM

जळगावात सुरु असलेल्या अभाविपच्या अधिवेशना दरम्यान चर्चासत्रातील सूर

ठळक मुद्देउद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकारविद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठेनोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे

आॅनलाईन लोकमतजळगाव , दि. २५ : युवकांनी रोजगाराची संधी मिळेल याची वाट बघत न बसता स्वत:मध्ये कौशल्य विकसित करून, शासकीय योजनांचा अभ्यासपूर्वक लाभ घेऊन स्वत:चा उद्योग सुरू करावा. नोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे, असा सूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनात सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता.‘सुशिक्षत बेरोजगारी-समाजापुढील एक आव्हान आणि उपाय’ हा या चर्चासत्राचा विषय होता. त्यात राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी.लक्ष्मण, माजी राष्टÑीय अध्यक्ष मिलिंद मराठे, आनंद कोठारी, प्रमुख अतिथी प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे, प्रदेशमंत्री अभिजित पाटील, स्वागत समिती सदस्य गिरीश कुलकर्णी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठेप्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे म्हणाले की, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले की, रोजगाराची संधी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र रोजगार मिळणे ही काही जादूची कांडी नाही. ही एक प्रक्रिया, पद्धती असते. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयाबाबतच्या संकल्पना स्पष्ट करणारे शिक्षण मिळतेय की नाही? माहिती नाही. मात्र आपण ते शिक्षण घेत नाही हे निश्चित. संकल्पना समजून घेतली पाहिजे. तरच रोजगार मिळेल. परिषद त्यासाठीच कार्य करणार आहे. नोकरीसाठीची पात्रता वाढविण्याच्या शक्यतेत अभाविपचे काम १०० टक्के महत्वाचे ठरेल. सरकारवर टीका करून अथवा मागणी करून नोकरी मिळणार नाही. तर नोकरी मिळविण्यासाठी आपलीही क्षमता हवी, असे सांगितले.उद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकारप्रदीप पेशकार म्हणाले, नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मक विचार करीत मी काय करू शकतो? हा या अधिवेशनातून घेऊन जाण्याचा मुद्दा आहे. जेवढे प्रयत्न सरकार, समाज करते, त्यापेक्षा दुप्पट प्रयत्न आपण स्वत: केले पाहिजे. सरकारी योजना आपल्यासाठी नाही, अशी भावना आपल्यात असते. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील आपल्याला माहित नसते. जर शासकीय योजनांची व्यवस्थित माहिती घेतली व आपल्याला काय करावयाचे आहे? आपल्यातील कोणते कौशल्य आहे? ते निश्चित करून व्यवसाय करावयाचे ठरविल्यास शासकीय योजनेतून त्यास निश्चितपणे मदत मिळू शकते. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, असे आवाहन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव