शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:35 IST

रेल्वेखाली घेतली उडी

जळगाव : आईने नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला म्हणून सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर) वय २३, रा.हिरा शिवा कॉलनी, जळगाव या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका लिलाबाई भालेराव या खोटे नगरातील हिरा शिवा कॉलनीत वास्तव्याला आहेत. पती मुंबईला असल्याने मुलगा सुमेध हा जळगावला त्यांच्याजवळच होता. तीन दिवसापूर्वीच तो मुंबईहून परत आला. सोमवारी सायंकाळी त्याने आईला नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह केला. त्यावर आईने दोन मोबाईल असतांना नवीन मोबाईल गरज काय असे म्हणत त्याला मोबाईल घेवून देण्यास नकार दिला. यावर सुमेधने आईशी भांडण केले. इतकेच काय त्याने आईचा हातही पिरगळला. वाद झाल्यानंतर मी आता आत्महत्याच करतो असे सांगून तो रात्री आठ वाजता घराबाहेर पडला.अशी पटली ओळखरामानंद नगरचे विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठले असता सुरुवतीला मयताची ओळख पटत नव्हती. मोबाईल आढळून आले, मात्र तो लॉक असल्याने मर्यादा येत होता. मृतदेहापासून काही अंतरावर दुचाकीही असल्याने तिचा क्रमांक आॅनलाईन वाहन अ‍ॅपमध्ये टाकला असता त्यात भालेराव नाव आहे. त्यामुळे पोलिसांनी भालेराव नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता तीन नावे पोलिसांचीच निघाली. तरीही ओळख पटत नव्हती. त्यामुळे शिंदे यांनी काही नगरसेवकांशी संपर्क केला असता त्यातही अपयश आले. सकाळी घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहून रुपेश प्रवीण राणे हा तरुण घटनास्थळाकडे आला असता त्याने सुमेधला व त्याची दुचाकी ओळखली.शिव कॉलनी पुलाजवळ केली आत्महत्याआईशी वाद घातल्यानंतर सुमेध हा दारु प्यायला गेला. त्यानंतर दुचाकी (एम.एच.क्र.१९ डी.एक्स. ०१४९) घेऊन तो शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळाजवळ गेला. तेथे बाजुला दुचाकी लावून खांब क्र. ४१७२ ते २६ च्या दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेखली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. रात्री साडे बारा वाजेनंतर ही घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन उपप्रबंधक अरुण देशमुख यांनी पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरुन सकाळी हेडकॉन्स्टेबल विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.एकुलता असल्याने लाडकालिलाबाई यांना सुमेध हा एकुलता मुलगा होता. वडील मुंबईत आरपीआयचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्याचे प्रचंड लाड केले जात असत. लाडका असल्याने हवी ती वस्तू त्याला मिळत होती. सद्यस्थितीत त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल होते. दरम्यान, याआधी देखील त्याने किरकोळ कारणावरुन वाद घालून आत्महत्येची धमकी आईला दिली होती रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होता, मात्र त्याने ते शिक्षणही अर्धवट सोडून दिल्याची माहिती मिळाली. आता त्याच्यासाठी अमरावतीचे स्थळही आले होते.मुलांना नकार पचवायची सवय नसते. त्यामुळे एखादी वस्तू किंवा मनासारखे झाले नाही तर मुलगा बेचैन होता. त्यासाठी लहानपणापासून त्यांना स्पष्टपणे नकार द्यावा. आई, वडीलही त्याला जबाबदार आहेत. कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. मुलगा चुकला असेल तर डोक्यावर हात फिरवून त्याला जवळही घ्यावे.-प्रतिभा हरणखेडकर, समुपदेशक

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव