शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, शेतकऱ्याने जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:57 IST

वडली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू : शासन तर कधी निसर्गाच्या चक्रात रोज मरतोय शेतकरी

सुनील पाटील ।जळगाव : आधी कोरडा दुष्काळ, त्यात शेतकरी होरपळला गेला. शासनाने अनेक घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात हाती मदत मिळालीच नाही. यंदा पाऊस चांगला आहे, त्यामुळे उत्पन्न चांगले येईल, ही अपेक्षा असताना पाऊस इतका येईल आणि शेतकºयाला उद्ध्वस्त करुन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते...सर्वच बाजूने शेतकरी मरतोय...आता तुम्हीच सांगा शेतकºयाने जगायचं कसं असा उद्विग्न सवाल वडली, ता.जळगाव परिसरातील शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून जिल्ह्यातील शेतकºयांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. वडली, म्हसावद, पाथरी, वावडदा, वराड, जळके, सुभाषवाडी व लोणवाडी परिसरात सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. कधी नव्हे इतक्या नद्या व नाले या भागातून ओसांडून वाहू लागले. सर्वच तलाव फुल्ल झाले. थोडाही पाऊस आला तर त्यात थेट पीकेच वाहून जात आहेत.एक दोन दिवसाची विश्रांती मिळाली व शेतजमीन सुकली की पुन्हा पाऊस येत असल्याने उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत.सोयाबीन, कापूस व मका शंभर टक्के उद्ध्वस्तवडली परिसरातील मुख्य पीक कापूस, कांदा,मका, सोयाबीन व ज्वारी हे आहे. या परतीच्या पावसामुळे हे सर्व पीके शंभर टक्के उद्ध्वस्त झाले आहेत.कापसाचा केवळ २० टक्के हंगाम बाकी आहे. कापसाच्या कैºया तितक्या शिल्लक आहेत. अशीच स्थिती राहिली तर तेही पीक येणार नाही.नाल्याकाठच्या विहीरी कोसळल्यावडली शिवारातील माणिक कृष्णा पाटील, गोकुळ वसंत पाटील, रतिलाल रामकृष्ण पाटील या शेतकºयांच्या नाल्याकाठी असलेल्या विहिरी या पावसामुळे कोसळल्या आहेत.गुरांच्या किडनीवर परिणाम...या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व मका सडल्याने त्याचा चाराही शिल्लक नाही. हा चारा गुरांनी खाल्ला तर त्यांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्याशिवाय घटसर्प या आजारालाही निमंत्रण देण्यासारखं आहे. गुरांच्या डॉक्टरांनी शेतकºयांमध्ये जनजागृती करुन हा चारा गुरांना खाऊ घालण्यापासून प्रतिबंध केला आहे. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यात चाºयाची बिकट समस्या निर्माण झाली आहे.शेतकºयांना सवलत का नाही?... सरकारी नोकरांना भरमसाठ पगार, पेन्शन, आमदार, खासदारांना पगार, पेन्शन व इतर भत्ते, उद्योजकांना कर सवलत, काही कंपन्यांची कर माफी असा फायदा सरकारकडून या वर्गाला केला जातो, आणि जगाचा पोशिंदा मानल्या जाणाºया शेतकºयाला का कोणती सलवत दिली जात नाही. कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्गच शेतकºयाला मारतो, मग शेतकºयांनी काय करावे असा सवाल अनेक लोटन रामचंद्र पाटील या शेतकºयाने केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव