शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:42 IST

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ...

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून घेतले आहे. अश्या वेळेस या रोगाला पळवून लावण्यासाठी सर्वांना आपल्या घरातच राहून राष्ट्राच्या सेवेची संधी मिळालेली आहे.पण बरेच जण त्या नियमांचे पालन करत नाहीत. खरं म्हणजे एकांत म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी संधी तर मूर्खांसाठी संकट आहे. आज रोजी भक्तीसाठी असो किंवा आपल्यातील असलेल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे असतो तो एकांत. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर एकांत म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक संधी समजतो. त्यामुळेच आम्हाला एकांताचा प्रवास सुकर वाटतो आणि तो भगवंतासाठी आपण अर्पण करून आपण निश्चितच भगवंताला प्राप्त करू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात, माझा जर एकांतात वास घडला तर जगाशी माझा येणारा संबंध टाळून मी आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहचेल कारण भगवंताची भक्ती असो की ध्येयाकडे वाटचाल ती आपल्याला एकांतानेच साध्य करता येईल.साधकांसाठी नित्य एकांत ही पर्वणीच असते. आपण एकांत निवडला तर आपले गुण-दोष पाहणारे लोक तिथे नसल्याने त्यांचे गुण-दोष हि आपल्या अंगी येत नाही. दोषापासून दूर जाऊन आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वांनी संतांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरातच थांबून एकांत निवडायला हवा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जेणेकरून आपण या कोरोनासारख्या रोगाला पळवून लावू शकतो आणि भगवंतही आपल्याला संकटातून लवकरच सावरेल.- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव