शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:42 IST

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ...

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून घेतले आहे. अश्या वेळेस या रोगाला पळवून लावण्यासाठी सर्वांना आपल्या घरातच राहून राष्ट्राच्या सेवेची संधी मिळालेली आहे.पण बरेच जण त्या नियमांचे पालन करत नाहीत. खरं म्हणजे एकांत म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी संधी तर मूर्खांसाठी संकट आहे. आज रोजी भक्तीसाठी असो किंवा आपल्यातील असलेल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे असतो तो एकांत. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर एकांत म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक संधी समजतो. त्यामुळेच आम्हाला एकांताचा प्रवास सुकर वाटतो आणि तो भगवंतासाठी आपण अर्पण करून आपण निश्चितच भगवंताला प्राप्त करू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात, माझा जर एकांतात वास घडला तर जगाशी माझा येणारा संबंध टाळून मी आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहचेल कारण भगवंताची भक्ती असो की ध्येयाकडे वाटचाल ती आपल्याला एकांतानेच साध्य करता येईल.साधकांसाठी नित्य एकांत ही पर्वणीच असते. आपण एकांत निवडला तर आपले गुण-दोष पाहणारे लोक तिथे नसल्याने त्यांचे गुण-दोष हि आपल्या अंगी येत नाही. दोषापासून दूर जाऊन आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वांनी संतांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरातच थांबून एकांत निवडायला हवा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जेणेकरून आपण या कोरोनासारख्या रोगाला पळवून लावू शकतो आणि भगवंतही आपल्याला संकटातून लवकरच सावरेल.- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव