शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:42 IST

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ...

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून घेतले आहे. अश्या वेळेस या रोगाला पळवून लावण्यासाठी सर्वांना आपल्या घरातच राहून राष्ट्राच्या सेवेची संधी मिळालेली आहे.पण बरेच जण त्या नियमांचे पालन करत नाहीत. खरं म्हणजे एकांत म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी संधी तर मूर्खांसाठी संकट आहे. आज रोजी भक्तीसाठी असो किंवा आपल्यातील असलेल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे असतो तो एकांत. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर एकांत म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक संधी समजतो. त्यामुळेच आम्हाला एकांताचा प्रवास सुकर वाटतो आणि तो भगवंतासाठी आपण अर्पण करून आपण निश्चितच भगवंताला प्राप्त करू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात, माझा जर एकांतात वास घडला तर जगाशी माझा येणारा संबंध टाळून मी आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहचेल कारण भगवंताची भक्ती असो की ध्येयाकडे वाटचाल ती आपल्याला एकांतानेच साध्य करता येईल.साधकांसाठी नित्य एकांत ही पर्वणीच असते. आपण एकांत निवडला तर आपले गुण-दोष पाहणारे लोक तिथे नसल्याने त्यांचे गुण-दोष हि आपल्या अंगी येत नाही. दोषापासून दूर जाऊन आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वांनी संतांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरातच थांबून एकांत निवडायला हवा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जेणेकरून आपण या कोरोनासारख्या रोगाला पळवून लावू शकतो आणि भगवंतही आपल्याला संकटातून लवकरच सावरेल.- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव