शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगाव जिल्ह्यातील ४५ शिक्षकांनी दिली चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:23 IST

जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावचाळीसगाव व जामनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसजिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोन्ही तालुक्याची माहिती गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक बुधवारी दुपारी १२ वाजता झाली. शिक्षणाधिकारी पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचा तालुकानिहाय व संवर्गनिहाय आढावा घेतला. ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांच्या वर आहेत, दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अंध व अपंग आहेत, अशा ९ शिक्षकांनी संवर्ग एक नुसार चुकीची माहिती भरली आहे. पतीपत्नी एकत्रिकरणासाठी अंतर जास्त दाखवून लाभ घेणाºया संवर्ग २ मध्ये २२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. तर अन्य संवर्गानुसार १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकरणी संवर्गनिहाय माहिती घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत मंगळवारी शिक्षण विभागाकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार सर्वच गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशी करीत माहिती सोबत आणली. मात्र जामनेर गटशिक्षणाधिकाºयांनी सोबत माहिती न आल्याने शिक्षणाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना सुनावले.काय आहेत शिक्षक बदलीमधील घोळजिल्हा परिषदेच्या १८०० शाळांमध्ये ६ हजार शिक्षक कार्यरत आहे. त्यातील ९० टक्के शिक्षकांच्या बदली करणात आली. यावर्षी प्रथमच आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ३० मे पर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ६ जून उजाडल्यानंतरही घोळ कायम आहे. जिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षकांना अजूनही नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. तर काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळविले होते. याविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावजिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत जिल्हाभरातील ३४ शिक्षकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारपर्यंत ३४ याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अन्याय झालेल्या आणखी काही शिक्षकांकडून याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzp schoolजिल्हा परिषद शाळा