शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जळगाव जिल्ह्यातील ४५ शिक्षकांनी दिली चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:23 IST

जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावचाळीसगाव व जामनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसजिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोन्ही तालुक्याची माहिती गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक बुधवारी दुपारी १२ वाजता झाली. शिक्षणाधिकारी पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचा तालुकानिहाय व संवर्गनिहाय आढावा घेतला. ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांच्या वर आहेत, दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अंध व अपंग आहेत, अशा ९ शिक्षकांनी संवर्ग एक नुसार चुकीची माहिती भरली आहे. पतीपत्नी एकत्रिकरणासाठी अंतर जास्त दाखवून लाभ घेणाºया संवर्ग २ मध्ये २२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. तर अन्य संवर्गानुसार १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकरणी संवर्गनिहाय माहिती घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत मंगळवारी शिक्षण विभागाकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार सर्वच गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशी करीत माहिती सोबत आणली. मात्र जामनेर गटशिक्षणाधिकाºयांनी सोबत माहिती न आल्याने शिक्षणाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना सुनावले.काय आहेत शिक्षक बदलीमधील घोळजिल्हा परिषदेच्या १८०० शाळांमध्ये ६ हजार शिक्षक कार्यरत आहे. त्यातील ९० टक्के शिक्षकांच्या बदली करणात आली. यावर्षी प्रथमच आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ३० मे पर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ६ जून उजाडल्यानंतरही घोळ कायम आहे. जिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षकांना अजूनही नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. तर काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळविले होते. याविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावजिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत जिल्हाभरातील ३४ शिक्षकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारपर्यंत ३४ याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अन्याय झालेल्या आणखी काही शिक्षकांकडून याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzp schoolजिल्हा परिषद शाळा