शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

यात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:11 IST

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार ...

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यातील मयत दोघेही एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत कटलरी साहित्याचे दुकान मांडण्यासाठी जात होते. मात्र, तिथे पोहचण्याआधीच त्यांच्यावर हा अनर्थ ओढवला.जळगाव येथील मासुमवाडी येथील रहीवासी शेख इक्बाल शेख ताहिर (वय २८), शेख आलताफ शेख वाहब (३२) हे दोघे चुलतभाऊ व त्यांच्यासोबत चालक वसिम पटेल (३०) हे तीन जण पिकअप वाहन (एमएच १५ ईव्ही २३८१)ने माहेजी येथून यात्रा आटोपून धुळे येथील रामबोरीस यात्रेत व्यवसायासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग सहावर धुळ््याकडून येणारा टँकर (एमएच ४८, जे ५२२) हा पिकअप वाहनास जोराने धडकला. या अपघातात शेख इक्बाल, शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टँकर चालक महेंद्र यादव (उत्तर प्रदेश) व पिकअप चालक वसिम पटेल (जळगाव) हे दोघ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती कळताच रुगणवाहिका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करीत अपघातातून मयतांना बाहेर काढले.कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादववर डॉ.योगेश साळुंखे व प्रशांत सोनवणे, डॉ.सुनिल पारोचे यांनी उपचार केले. सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिले. पारोळा पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक शेख शफी यांच्या फिर्यादीवरून टँकरचालक महेंद्र यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यात्रेत कटलरी साहित्य विकून करायचे उदरनिर्वाहमूळ मासुमवाडी (जळगाव) येथील हे दोघे चुलत भाऊ कटलरीचे व पोळपाट, लाटणे विक्रीचे साहित्य आपल्या वाहनात घेऊन चालक वसीम पटेलसह खान्देशात जिथे जिथे यात्रा असेल त्या ठिकाणी दुकान लावत. या महिन्यात ६ यात्रा करून ते पाचोरा तालुक्यातील माहिजीची यात्रा आटोपून धुळे तालुक्यातील राम बोरीस यात्रेसाठी निघाले होते. पण त्या आधीच त्यांचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. ते दोघेही गरीब कुटुंबातील होते. अपघातानंतर वाहनातील साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते.इकबालचे दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न... या अपघातात ठार झालेले अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय ३२) व शेख इकबाल शेख ताहेर मन्यार (वय २७) दोन्ही एकमेकांचे नातेवाईक असून कासमवाडीला लागून असलेल्या हाजी अहमद नगरातील रहिवाशी होते. अल्ताफ याच्या पश्चातआई, वडील, पत्नी रहिनाबी, मुलगी सुफीया, फातिमा व मुलगा रेहान तर इकबाल याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.आई, वडील, पत्नी रेहानबी व चार भाऊ आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव