शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बळीराजाचे कर्जाचे ओझे कमी होण्यापेक्षा मनस्ताप अधिक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 21:11 IST

एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था

प्रमोद पाटीलकासोदा, जि. जळगाव : कर्जमाफीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून कर्जमाफीच्या अंमलबजावणीस एक वर्षाच्यावर कालावधी झाला असला तरी अद्यापही येथील २६१ शेतकºयांना कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा कायम आहे.बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके व्हावे, या उद्देशाने सरकारने कर्जमाफी करण्याच्या निर्णय घेतला असावा, असे वाटणाºया बळीराजाच्या डोक्यालाच या योजनेतील घोळामुळे अधिक त्रास वाढला असल्याचे शेतकरी सांगत आहे. १३ हिरव्या याद्या आल्या व त्यानंतर महिनाभरापासून एकही यादी आलेली नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी तर नाही ? असा संतप्त सवाल या योजनेपासून वंचित शेतकरी करीत आहेत.केवळ याद्याच याद्या, कार्यवाही शून्यसंपूर्ण कर्जमाफी न झाल्यामुळे दीड लाखाच्यावर कर्ज असलेले कर्जधारकदेखील माफी मिळेल या आशेने कर्ज भरत नाहीत. प्रत्येकवेळी तारीख वाढवून मिळत असल्याने घोळ अधिकच वाढला आहे. पूर्वी घोषीत केलेल्या कर्जमाफीच्या याद्या पूर्ण झाल्या नाही तरी २०१६-१७ च्या नव्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. केवळ याद्याच मागवल्या असून कार्यवाही मात्र कुठलीच नाही. जिल्ह्यात अशी एकदेखील विकास संस्था नाही की त्या संस्थेत शंभर टक्के कर्जमाफी झाली असेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्ज प्रोत्साहन योजना विरली हवेतकर्ज प्रोत्साहन योजनेतदेखील अनेक शेतकरी शासन आदेशाची प्रतीक्षा आहेत. तर एक रकमी भरणा (वन टाईम सेटलमेंट ) योजनेत सुध्दा दहा-बारा वेळा मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम अजून वाढला आहे. या योजनेचादेखील फायदा शेतकरी घेऊ शकत नसल्याचे चित्र परिसरात आहे.पीक विम्याबाबत शेतक-यांवर अन्यायपीक विमा बाबत तर मोठा अन्यायच एरंडोल तालुक्यावर झाला आहे. केळी व आंबा पिकांसाठीच पीक विमा मिळाला. मात्र एरंडोल तालुक्यात बागायती क्षेत्रच नसल्याने या पिकांना विम्याचा लाभ तालुक्यात होऊ शकला नाही. कापूस मका व इतर खरीप पिकांना तर एकाही शेतकºयाला हा लाभ मिळाला नाही. अत्यंत महत्त्वाच्या या विषयी सरकारने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सहकार क्षेत्र मोडीस निघेल अशी वाटचाल तर सरकार करीत नाही ना असा सवालदेखील सहकार क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.वि.का. सोसायटींची बिकट स्थितीकर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी सोसायटीकडे भरणाही करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वि.का. सोसायटींची आवक थांबून त्यांची अर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यात कर्मचाºयांचे पगारही देता येत नसल्याचे विदारक चित्र जवळपास सर्वत्र आहे, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे सरकारने हा घोळ लवकरात लवकर मिटवून शेतकºयांना दिलासा देण्यासह सोसायटींनादेखील बिकट स्थितीतून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कर्जमाफीविषयीचे सर्व प्रकरणे मार्च अखेर निकाली निघतील. वि.का.संस्थानी ज्या याद्या पाठविल्या आहेत, त्यापैकी कोणीही वंचित राहणार नाही. पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश नसून त्यात एरंडोल असल्याने पीक विम्याचा लाभ या तालुक्याला मिळणार नाही.- विलास वाणी, विभागीय उप व्यवस्थापक जिल्हा बँक.प्रत्येक वेळी कर्जमाफी संदर्भात याद्या मागवण्यात येतात. अशा किमान सहा वेळा याद्या पाठवल्या गेल्या आहेत. काही दुरूस्ती असल्याने पुन्हा-पुन्हा पाठवल्या आहेत. मात्र अजून हा घोळ मिटत नाही. सभासदांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने भरणा थांबला आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे पगार थांबल असून प्रवास खर्चासाठीदेखील संस्थेकडे पैसे नाहीत. विकासंस्थाना वाईट दिवस आले आहेत.- दीपक वाणी, माजी चेअरमन, वि.का.सोसायटी कासोदा.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव