शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

बळीराजाचे कर्जाचे ओझे कमी होण्यापेक्षा मनस्ताप अधिक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 21:11 IST

एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था

प्रमोद पाटीलकासोदा, जि. जळगाव : कर्जमाफीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून कर्जमाफीच्या अंमलबजावणीस एक वर्षाच्यावर कालावधी झाला असला तरी अद्यापही येथील २६१ शेतकºयांना कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा कायम आहे.बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके व्हावे, या उद्देशाने सरकारने कर्जमाफी करण्याच्या निर्णय घेतला असावा, असे वाटणाºया बळीराजाच्या डोक्यालाच या योजनेतील घोळामुळे अधिक त्रास वाढला असल्याचे शेतकरी सांगत आहे. १३ हिरव्या याद्या आल्या व त्यानंतर महिनाभरापासून एकही यादी आलेली नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी तर नाही ? असा संतप्त सवाल या योजनेपासून वंचित शेतकरी करीत आहेत.केवळ याद्याच याद्या, कार्यवाही शून्यसंपूर्ण कर्जमाफी न झाल्यामुळे दीड लाखाच्यावर कर्ज असलेले कर्जधारकदेखील माफी मिळेल या आशेने कर्ज भरत नाहीत. प्रत्येकवेळी तारीख वाढवून मिळत असल्याने घोळ अधिकच वाढला आहे. पूर्वी घोषीत केलेल्या कर्जमाफीच्या याद्या पूर्ण झाल्या नाही तरी २०१६-१७ च्या नव्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. केवळ याद्याच मागवल्या असून कार्यवाही मात्र कुठलीच नाही. जिल्ह्यात अशी एकदेखील विकास संस्था नाही की त्या संस्थेत शंभर टक्के कर्जमाफी झाली असेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्ज प्रोत्साहन योजना विरली हवेतकर्ज प्रोत्साहन योजनेतदेखील अनेक शेतकरी शासन आदेशाची प्रतीक्षा आहेत. तर एक रकमी भरणा (वन टाईम सेटलमेंट ) योजनेत सुध्दा दहा-बारा वेळा मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम अजून वाढला आहे. या योजनेचादेखील फायदा शेतकरी घेऊ शकत नसल्याचे चित्र परिसरात आहे.पीक विम्याबाबत शेतक-यांवर अन्यायपीक विमा बाबत तर मोठा अन्यायच एरंडोल तालुक्यावर झाला आहे. केळी व आंबा पिकांसाठीच पीक विमा मिळाला. मात्र एरंडोल तालुक्यात बागायती क्षेत्रच नसल्याने या पिकांना विम्याचा लाभ तालुक्यात होऊ शकला नाही. कापूस मका व इतर खरीप पिकांना तर एकाही शेतकºयाला हा लाभ मिळाला नाही. अत्यंत महत्त्वाच्या या विषयी सरकारने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सहकार क्षेत्र मोडीस निघेल अशी वाटचाल तर सरकार करीत नाही ना असा सवालदेखील सहकार क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.वि.का. सोसायटींची बिकट स्थितीकर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी सोसायटीकडे भरणाही करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वि.का. सोसायटींची आवक थांबून त्यांची अर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यात कर्मचाºयांचे पगारही देता येत नसल्याचे विदारक चित्र जवळपास सर्वत्र आहे, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे सरकारने हा घोळ लवकरात लवकर मिटवून शेतकºयांना दिलासा देण्यासह सोसायटींनादेखील बिकट स्थितीतून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कर्जमाफीविषयीचे सर्व प्रकरणे मार्च अखेर निकाली निघतील. वि.का.संस्थानी ज्या याद्या पाठविल्या आहेत, त्यापैकी कोणीही वंचित राहणार नाही. पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश नसून त्यात एरंडोल असल्याने पीक विम्याचा लाभ या तालुक्याला मिळणार नाही.- विलास वाणी, विभागीय उप व्यवस्थापक जिल्हा बँक.प्रत्येक वेळी कर्जमाफी संदर्भात याद्या मागवण्यात येतात. अशा किमान सहा वेळा याद्या पाठवल्या गेल्या आहेत. काही दुरूस्ती असल्याने पुन्हा-पुन्हा पाठवल्या आहेत. मात्र अजून हा घोळ मिटत नाही. सभासदांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने भरणा थांबला आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे पगार थांबल असून प्रवास खर्चासाठीदेखील संस्थेकडे पैसे नाहीत. विकासंस्थाना वाईट दिवस आले आहेत.- दीपक वाणी, माजी चेअरमन, वि.का.सोसायटी कासोदा.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव