शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत २४ गावांमध्ये होणार ५११ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांना गती देण्याबरोबर अद्याप जी कामे सुरू व्हावयाची आहेत ती कामे सर्व संबंधित यंत्रणानी सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिले.

राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे उपस्थित होते.

या अभियानात हरताळा गाव समूह ता. मुक्ताईनगर, पातोंडा, ता. चाळीसगाव, एनगाव, ता. बोदवड यांची निवड करण्यात आली आहे. या अभियानात हरताळा परिसरातील सहा गावांमध्ये ३४२.९६ कोटींच्या ३१० कामांची नोंद करावयाची आहे. त्यापैकी २०१ कामांची नोंद तर १९३ कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. पातोंडा परिसरातील चार गावांमध्ये ९७ कोटी खर्चाच्या २१६ कामांची नोंद केली आहे. तर ९५ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. तसेच एनगाव गाव समूहातील चौदा गावांमध्ये ७१.५५ कोटींच्या १४५ कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी फक्त ४६ कामांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दिगंबर लोखंडे यांनी केली आहे.