शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

जळगावला कॉग्रेसच्या निषेध मोर्चात कार्यकर्त्यांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 12:37 IST

विश्वासघात दिन

ठळक मुद्देबेरोजगारी, शेतकरी आत्महत्येकडे वेधले लक्षजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - मोदी सरकार विरोधात कॉग्रेसतर्फे शनिवारी निषेध मोर्चा काढण्यत आला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० ते ५५ इतकी संख्या होती. त्यातही काही पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाले. मोर्चात कार्यकर्ते कमी असल्याने मोर्चाचा प्रभाव दिसून आला नाही.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्याने जल्लोष केला जात असताना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवार २६ रोजी विश्वासघात दिन पाळण्यात आला. यानिमित्त शिवतीर्थ मैदानापासून काढण्यात आलेल्या मुकमोर्चात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गैरव्यवहाराचे फलक झळकवित लक्ष्य वेधण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी आमदार अ‍ॅड.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानापासून दुपारी ३.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोदी सरकारचा निषेध म्हणून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाताला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविला. वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, गैरव्यवहाराचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.हा मोर्चा स्टेट बँक चौकातून, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला.मोर्चात अ‍ॅड.ललिता पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जि.प.चे आरोग्य सभापती दिलीप पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, जिल्हा युवक अध्यक्ष पराग पाटील, सरचिटणीस कफील शेख, रतिलाल चौधरी, सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष संजय वराडे, धनंजय पाटील, अजमल शाह अब्दुल शाह, हारून शाह, कमलाकर पाटील, जाकीर बागवान, हितेश पाटील, पांडूरंग पाटील, नीलेश पाटील, प्रमोद पाटील,प्रदीप नेहेते, विष्णु घोडेस्वार यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.काही पदाधिकारीही अनुपस्थितमोर्चा दरम्यान प्रदेश पदाधिकारी व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी सभापती प्रदीप पवार हे अनुपस्थित होते.नेत्यांचा निषेध आणि कार्यकर्त्यांची सेल्फीनिषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील व पदाधिकाºयांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. या दरम्यान उर्वरित कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत सेल्फी काढत हौस फेडली. तर काही कार्यकर्ते आल्या पावली माघारी परतल्याचे दिसून आले.भर दुपारी निघाला निषेध मोर्चाजिल्हाभरातील कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होता यावे यासाठी काँग्रेसतर्फे भर दुपारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी ४ वाजेपर्यंत अवघे ५० ते ५५ महिला व पुरुष कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. भर दुपारी पायी चालत यावे लागल्याने मोर्चात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते घामाघूम झाले.४जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आला असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी मोर्चाच्या आयोजनाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. केंद्रातील भाजपा सरकारला २६ रोजी चार वर्ष पूर्ण होत आहे. या काळात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कृषी मालाला हमी भाव नसल्याने शेतकरी चिंतीत आहे. पिकविमा व कर्जमाफीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. कष्टकरी, शेतकरी व व्यापाºयांचा या शासनाने विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव