शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कर्मचा-यांच्या लेखनी बंद आंदोलनाने विद्यापीठातील कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 19:42 IST

जळगाव : सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहीजे...असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही...तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना त्वरित ...

जळगाव : सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहीजे...असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही...तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना त्वरित लागू करण्यात यावी, अशा जोरदार घोषणाबारी करीत विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांच्या लेखनी व अवजार बंद आंदोलनाला गुरूवारपासून सुरूवात झाली. आंदोलनात विद्यापीठातील ३९५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्यामुळे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठातील कामकाज ठप्प पडले होते.विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने गुरूवारपासून राज्यभरात आंदोलनाला सुरूवात झाली आहे. विद्यापीठातील यात महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघासह विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. विद्यापीठातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या स्थानिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या असून गुरूवारी आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तसेच जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.आंदोलनात सहभागी असल्याची केली सामुहिक घोषणादरम्यान, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजता द्वारसेभेला उपस्थित राहून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दोन्ही संघटनांनी पुरकारलेल्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी होत असल्याची सामुहिक घोषणा केली. नंतर प्रशासकीय इमारतीसमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना कृती समितीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मांडली. त्यात त्यांनी वित्त मंत्री,तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वित्त विभागातील संबंधित प्रधान सचिवांना वारंवार भेटून प्रश्न सोडविण्याची विनंती केल्या, मात्र एकही प्रश्न सोडविण्‍यात आला नाही. महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत रास्त व न्याय असूनही या मागण्यांच्या संदर्भात शासनाकडून अन्याय होत असल्याने नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याची सांगितले. आंदोलनामुळे महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यालाही शासनच जबाबदार राहील, असेही त्यांनी सांगितले.अशा आहेत मागण्यासातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे, आश्वासित प्रगती योजनेचे शासन निर्णय पुनर्नियोजित करावे, आश्वासिततंर्गत ३ लाभांची नवीन योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, पदोन्नतीतील आरक्षणाला मान्यता देणे, माजी कुलगुरू सी.एफ.पाटील यांच्या समितीचे कामकाज सुरू करावे, आदी मागण्या संघटनांकडून करण्‍यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास १ ऑक्टोंबरपासून काम बंद आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.या पदाधिका-यांचा आहे आंदोलनात सहभागमहाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कृती समितीचे जयंत सोनवणे, अरूण सपकाळे, अजमल जाधव, विकास बिऱ्हाडे, सुभाष पवार, सुनील आढाव, वसंत वळवी, राजू सोनवणे, चंद्रकांत वानखेडे, सुनील सपकाळे, सविता सोनकांबळे, शांताराम पाटील, पद्माकर कोठावदे, अरविंद गिरणारे, मृणालिनी चव्हाण, प्रमोद चव्हाण, दुर्योधन साळुंखे, महेश पाटील, शिवाजी पाटील आदी पदाधिका-यांचा आंदोलनात सहभाग आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव