शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सुख-दु:खाची ऊन-सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:15 IST

संमिश्र प्रसंगांची मोठी रांग

१० एप्रिल १९०८ साल. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गुलाबला मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले रामी. आपल्याला नात झाल्याचा विशेष आनंद कस्तुरबाने साजरा केला. आपल्या नातलग बायकांच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पाडले. चारच दिवसांनंतर गोकूळदास या भाच्याचे निधन झाले. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो फिनिक्सला येणार होता. सारे संपले होते. कस्तुरबाला गोकूळदासच्या आठवणींनी बेजार केले. एकीकडे नातीच्या जन्माचा उत्सव तर दुसरीकडे भाच्याच्या निधनाचे दु:ख तिच्या वाटेला. अशा संमिश्र प्रसंगांची मोठी रांग सदा न् कदा असायची. एकीकडे उसळता आगडोंब असायचा तर दुसरीकडे झगमगता सण.गांधीजी तुरुंगात होते. अल्बर्ट वेस्टने एका तारेने कस्तुरबाच्या तब्येतीबद्दल त्यांना कळवले होते. तिला रुग्णालयात हलवावे लागेल, असे त्याचे मत होते. यासाठी गांधीजींनीे लवकर तुरुंगातून सुटका करून घ्यावी. माघारी परतावे, असा त्याने सल्ला दिला. हे पत्र वाचून गांधीजींनी उत्तरादाखल ९ नोव्हेंबर १९०८ रोजी लिहिले-‘प्रिय कस्तूर,तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझे हृदय विदिर्ण झाले. तुझी सेवा करायला माझे मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारे काही अर्पण केलेले आहे. मी नाही तिकडे येऊ शकत. दंड भरल्यावर खरे तर मला तिथे येता येईल पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर. योग्य आणि नियमित आहार घे. तू बरी होशील आणि माझ्या दुर्दैवाने तू जर मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझे असे निघून जाणे काही वाईट नाही.माझे तुजवर इतके प्रेम आहे की, तू निघून गेल्यावर माझ्यासाठी जिवंत राहशील. तुझा आत्मा तर अमर आहे. मी तुला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, तुला जावे लागले तर मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितले आहे की, तू ईश्वरावर आस्था ठेवून जीव सोडावास. तुझे बलिदान सत्याग्रहासाठी असेल. माझा लढा काही केवळ राजकीय स्वरूपाचा नाही. तो धार्मिक स्वरूपाचा आहे. यामुळे अतिशय स्वच्छ आहे. यात जीवन काय आणि मरण काय? दोघेही सारखे. तुही असे जाणे. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, अशी मी उमेद करतो, असे मागणे मागतो.’- प्रा.डॉ. विश्वास पाटील