शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

सुख-दु:खाची ऊन-सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:15 IST

संमिश्र प्रसंगांची मोठी रांग

१० एप्रिल १९०८ साल. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गुलाबला मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले रामी. आपल्याला नात झाल्याचा विशेष आनंद कस्तुरबाने साजरा केला. आपल्या नातलग बायकांच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पाडले. चारच दिवसांनंतर गोकूळदास या भाच्याचे निधन झाले. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो फिनिक्सला येणार होता. सारे संपले होते. कस्तुरबाला गोकूळदासच्या आठवणींनी बेजार केले. एकीकडे नातीच्या जन्माचा उत्सव तर दुसरीकडे भाच्याच्या निधनाचे दु:ख तिच्या वाटेला. अशा संमिश्र प्रसंगांची मोठी रांग सदा न् कदा असायची. एकीकडे उसळता आगडोंब असायचा तर दुसरीकडे झगमगता सण.गांधीजी तुरुंगात होते. अल्बर्ट वेस्टने एका तारेने कस्तुरबाच्या तब्येतीबद्दल त्यांना कळवले होते. तिला रुग्णालयात हलवावे लागेल, असे त्याचे मत होते. यासाठी गांधीजींनीे लवकर तुरुंगातून सुटका करून घ्यावी. माघारी परतावे, असा त्याने सल्ला दिला. हे पत्र वाचून गांधीजींनी उत्तरादाखल ९ नोव्हेंबर १९०८ रोजी लिहिले-‘प्रिय कस्तूर,तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझे हृदय विदिर्ण झाले. तुझी सेवा करायला माझे मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारे काही अर्पण केलेले आहे. मी नाही तिकडे येऊ शकत. दंड भरल्यावर खरे तर मला तिथे येता येईल पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर. योग्य आणि नियमित आहार घे. तू बरी होशील आणि माझ्या दुर्दैवाने तू जर मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझे असे निघून जाणे काही वाईट नाही.माझे तुजवर इतके प्रेम आहे की, तू निघून गेल्यावर माझ्यासाठी जिवंत राहशील. तुझा आत्मा तर अमर आहे. मी तुला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, तुला जावे लागले तर मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितले आहे की, तू ईश्वरावर आस्था ठेवून जीव सोडावास. तुझे बलिदान सत्याग्रहासाठी असेल. माझा लढा काही केवळ राजकीय स्वरूपाचा नाही. तो धार्मिक स्वरूपाचा आहे. यामुळे अतिशय स्वच्छ आहे. यात जीवन काय आणि मरण काय? दोघेही सारखे. तुही असे जाणे. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, अशी मी उमेद करतो, असे मागणे मागतो.’- प्रा.डॉ. विश्वास पाटील