शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुख-दु:खाची ऊन-सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:15 IST

संमिश्र प्रसंगांची मोठी रांग

१० एप्रिल १९०८ साल. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गुलाबला मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले रामी. आपल्याला नात झाल्याचा विशेष आनंद कस्तुरबाने साजरा केला. आपल्या नातलग बायकांच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पाडले. चारच दिवसांनंतर गोकूळदास या भाच्याचे निधन झाले. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो फिनिक्सला येणार होता. सारे संपले होते. कस्तुरबाला गोकूळदासच्या आठवणींनी बेजार केले. एकीकडे नातीच्या जन्माचा उत्सव तर दुसरीकडे भाच्याच्या निधनाचे दु:ख तिच्या वाटेला. अशा संमिश्र प्रसंगांची मोठी रांग सदा न् कदा असायची. एकीकडे उसळता आगडोंब असायचा तर दुसरीकडे झगमगता सण.गांधीजी तुरुंगात होते. अल्बर्ट वेस्टने एका तारेने कस्तुरबाच्या तब्येतीबद्दल त्यांना कळवले होते. तिला रुग्णालयात हलवावे लागेल, असे त्याचे मत होते. यासाठी गांधीजींनीे लवकर तुरुंगातून सुटका करून घ्यावी. माघारी परतावे, असा त्याने सल्ला दिला. हे पत्र वाचून गांधीजींनी उत्तरादाखल ९ नोव्हेंबर १९०८ रोजी लिहिले-‘प्रिय कस्तूर,तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझे हृदय विदिर्ण झाले. तुझी सेवा करायला माझे मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारे काही अर्पण केलेले आहे. मी नाही तिकडे येऊ शकत. दंड भरल्यावर खरे तर मला तिथे येता येईल पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर. योग्य आणि नियमित आहार घे. तू बरी होशील आणि माझ्या दुर्दैवाने तू जर मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझे असे निघून जाणे काही वाईट नाही.माझे तुजवर इतके प्रेम आहे की, तू निघून गेल्यावर माझ्यासाठी जिवंत राहशील. तुझा आत्मा तर अमर आहे. मी तुला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, तुला जावे लागले तर मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितले आहे की, तू ईश्वरावर आस्था ठेवून जीव सोडावास. तुझे बलिदान सत्याग्रहासाठी असेल. माझा लढा काही केवळ राजकीय स्वरूपाचा नाही. तो धार्मिक स्वरूपाचा आहे. यामुळे अतिशय स्वच्छ आहे. यात जीवन काय आणि मरण काय? दोघेही सारखे. तुही असे जाणे. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, अशी मी उमेद करतो, असे मागणे मागतो.’- प्रा.डॉ. विश्वास पाटील