शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

निरुपयोगी शेतमालातून लाकडी विटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 21:14 IST

कासोदा येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देया ब्रिकेट बॉयलरसाठी वापरण्यात येतात कासोदा येथील तरुणाचा अभिनव उपक्रम ५० मजुरांना रोजगार देणारा ‘मेक इंन इंडिया’

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कपाशीची झाडे उपटण्याची मजुरी तर वाचतेच, पण दररोज ४० ते ५० मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. सरकारचे ‘मेक इंन इंडिया’ यशस्वी होईल तेव्हा होईल पण आज या तरुणाने हा नवा व्यवसाय सुरू करून दगडी कोळशाला मोठा पर्याय स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या तरुणाचे कौतुक होत आहे.सध्या पावसाळा संपून कापूस वेचणी संपली आहे. कापसाची झाडे उपटून शेत रब्बीसाठी तयार करण्याची कामे जोरात सुरू आहेत. पण येथील समाधान शांताराम चौधरी या तरुणाने कपाशीच्या हिरव्या झाडांपासून ब्रिकेट बनवण्यासाठी एक छोटासा उद्योग सुरू केला आहे. टॅÑक्टरसोबत एक कुट्टी करण्याचे मशीन घेऊन सुमारे २० ते २५ मजूर घेऊन कापसाची झाडं असलेल्या शेतात जातो. तेथील सर्व झाडे (पºहाट्या) उपटून तेथे कुट्टी करण्यात येते. ही कुट्टी ब्रिकेट बनवण्याच्या कारखान्यात आणली जाते. त्यानंतर या कारखान्यात ब्रिकेट बनवल्या जातात. या ब्रिकेट बॉयलरसाठी वापरण्यात येतात. मोठमोठ्या कारखान्यात जेथे दगडी कोळसा वापरला जातो त्याला या ब्रिकेट पर्याय म्हणून वापरल्या जाऊ लागल्या आहेत. या ब्रिकेटचे वैशिष्ट्य असे की या ब्रिकेटपासून अजिबात प्रदूषण होत नाही. दगडी कोळसा दहा हजार रुपये टन विकला जातो. तर या ब्रिकेट पाच हजार रुपये टन विकल्या जातात. त्यामुळे यांना मोठी मागणी असते.सुमारे २ लाख खर्चाचे कुट्टी मशीन व ५ लाख रुपयांचे ट्रॅक्टर व ब्रिकेट बनवण्यासाठी उभारण्यात येणारा २० लाख रुपये खर्चाचा छोटा कारखाना, अशा सुमारे २५ ते ३० लाख रुपये भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. तालुक्यात अशी अभिनव कल्पना या तरुणाला सुचली व त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. सुमारे सहा हजार चौरस फूट जागेतच ५० मजुरांना पोटापाण्यासाठी हा उद्योग सुरू झाला आहे. यात शेतातील पºहाट्या उपटण्याची मजुरी वाचत असल्याने शेतकरीदेखील खूश आहेत.फक्त कापसाचे झाडेच नाहीत, तर मक्याचे भुट्टे, तुरीच्या काड्या, सोयाबीन, हरभरा या पिकांचे वेस्टेज मटेरियल आम्ही स्वखर्चाने उचलून घेऊन जातो. त्यापासून ब्रिकेट बनवतो. शेतकऱ्यांची मजुरी वाचते, म्हणून आम्हाला सर्वच शेतकºयांकडून निरोप येत असतात.-समाधान शांताराम चौधरी, कासोदा 

टॅग्स :FarmerशेतकरीErandolएरंडोल