शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रस्त्यासाठी महिलांचा ठिय्या; आमदारांना द्यावे लागले लेखी आश्वासन

By सुनील पाटील | Updated: September 29, 2023 18:14 IST

रामेश्वर कॉलनीतील प्रकार, एकाच रस्त्यासाठी दोन माजी नगरसेवकांचे पत्र

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: एकच रस्ता दोन माजी नगरसेवकांनी वेगवेगळ्या निधीतून घेतला आहे. निधीचा अपव्यव होऊ नये म्हणून कोणत्याही एकाच योजनेतून काम व्हावे या दोन नगरसेवकांच्या वादात रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त झालेल्या रामेश्वर कॉलनीतील महिलांनी शुक्रवारी स्वामी समर्थ चौकात ठिय्या मांडला होता. या प्रभागाच्या माजी नगरसेवकांसह आमदार सुरेश भोळे यांना घटनास्थळी जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. माजी नगरसेवक व आमदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

रामेश्वर कॉलनीतील गट नं २५०, २५१ मध्ये भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील व शिंदे गटाचे आशुतोष पाटील यांनी रस्त्याचे काम टाकलेले आहे. एक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर दुसरा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आहे. एकाच रस्त्यासाठी दोघांनी प्रयत्न केलेले आहेत. आपलेच काम व्हावे यासाठी दोन्ही माजी नगरसेवकांकडून प्रयत्न केले जात आहे. आशुतोष पाटील पालकमंत्र्यांच्या गटाचे तर घुगे पाटील आमदारांच्या गटाचे आहेत. या दोघांच्या वादात रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप झाला.

शुक्रवारी सकाळी १० वाजता माजी नगरसेविका सुमित्रा सोनवणे,विजया मांडोळे, कल्पना ढाकणे, मिराबाई पाडळकर, रत्ना महाले, जया पाटील, भारती महाजन, संगीता पाटील, जयश्री चव्हाण, सुषमा काकडे, संदीप मांडोळे, गणेश पाटील, विशाल देशमुख, आशिष राजपूत, महेश माळी, हर्षल वाणी, नीलेश नारखेडे, आप्पा चौधरी, दीपक मांडोळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी स्वामी समर्थ चौकात ठिय्या मांडला होता.

मतदानावर बहिष्कार!

रामेश्वर कॉलनीतील समस्यांबाबत नागरिकांनी ‘रस्ते हरवले, आणि पाणी पेटले’ असे वर्णन केले. पाण्यासाठी केलेली अमृत योजना फेल झाली असून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे पूर्वीचीच पाण्याची लाईन सुरु करावी. पूर्वी चार इंच पाईप लाईनद्वारे एका टप्प्यात ५० घरांना पाणी मिळायचे. आता चार इंच लाईनवर ४०० घरांना पाणी दिले जाते,त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा मोटारी दोन दोन तास चालवून विज बिल वाढत आहे. नागरिक वेळेवर घर पट्टी, पाणी पट्टी भरतात, तरीही मनपा सुविधा का देत नाही. कर भरुन सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव