शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:04 PM

महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे राष्ट्रीय परिषदेत देवयानी ठाकरे यांचे प्रतिपादन‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

चाळीसगाव, जि.जळगाव : महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या सहयोगाने १४ रोजी ‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल होते.व्यासपीठावर जि.प.शिक्षण समिती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मिता बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शुभदा ठाकरे, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, विनोद कोतकर, स्मिता बच्छाव, संपदा पाटील, बुदेलखंडी प्रदीप अहिरराव, क.मा.राजपूत इत्यादी उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख डॉ.डी.एस.निकुंब यांनी केले.यावेळी न्यायाधीश अनिता गिरडकर आपल्या बीज भाषणात म्हणाल्या की, महिलांसोबत पुरुषामध्येसुद्धा जागृती होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच पुरुष वाईट नाही, पण विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण कायद्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. जेव्हा २२-२३ वर्षाचे मुलं-मुली घटस्फोटासाठी येतात, तेव्हा खूप वाईट वाटते की, कुठे भरटकतो आहे, समाज आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. तसेच त्यांनी महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती सांगीतली.सूत्रसंचालन डॉ.गंगापूरकर व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले तर आभार अजय काटे यांनी मानले.

टॅग्स :WomenमहिलाChalisgaonचाळीसगाव