शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना कमी होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:47 IST

वर्षभरात ७२३ घटना

ठळक मुद्देबालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकप्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणार

६७ महिलांवर बलात्कार, १६ खूनसुनील पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ -महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात २०१७ मध्ये महिला अत्याचाराच्या ७२३ घटना घडल्या आहेत. त्यात ६७ महिलांवर बलात्कार झालेला असून, १६ महिलांचे खून झालेले आहेत. लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कळमसरे व दोंडाईचा येथील प्रकरण ताजे आहे.महिलांना आरक्षण, सर्व क्षेत्रात महिलांना प्राधान्य, मुलगी शिकली प्रगती झाली, ‘यशस्वी पुरुषामागे स्त्री’ अशा गोड शब्दांची रोज उधळण होत असली तरी, समाजात महिलांची होणारी हेळसांड थांबलेली नाही. उलट महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. कार्यालय, शाळा-महाविद्यालय, बस-रेल्वे प्रवास आणि इतर ठिकाणीही महिलांना कोणत्या ना कोणत्या घटनेला रोज सामोरे जावे लागते.या गुन्ह्यांची नोंदही पोलीस ठाण्यात केली जाते. पुढे प्रकरण न्यायालयात जाते. मात्र तिथूनही प्रकरणे लवकर पुढे सरकत नाहीत. साहजिकच इथेही या महिलांची हेळसांड होते.बालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकराष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या नोंदणीनुसार २०१३ मध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहेत. बालगुन्हेगारांकडून हे अत्याचार करण्याचे प्रमाण १३२ टक्क्यांनी वाढले आहे.१६ ते १८ वयोगटातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. २००२ मध्ये हे प्रमाण ४८.७ टक्के होते. ते २०१३ मध्ये ६६.३ टक्के झाले आहे.देशात महाराष्टÑ आघाडीवरमहिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी सुमारे १३ हजार ८२७ तक्रारींची नोंद झाली. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये १३ हजार ३२३ आणि आंध्र प्रदेशात १३ हजार २६७ तक्रारी दाखल झाल्या. देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणारअत्याचार झालेल्या महिलांना मदत मिळण्यासाठी वन स्टॉप सेंटर उघडण्यात येणार आहे. देशातील ६६० ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र उघडले जाईल. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या केंद्र्रात वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्यता, कायदेशीर सल्ला, मानस-सामाजिक सल्ला आणि तात्पुरता निवारा आदी बाबी असणार आहेत. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव