शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना कमी होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:47 IST

वर्षभरात ७२३ घटना

ठळक मुद्देबालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकप्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणार

६७ महिलांवर बलात्कार, १६ खूनसुनील पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ -महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात २०१७ मध्ये महिला अत्याचाराच्या ७२३ घटना घडल्या आहेत. त्यात ६७ महिलांवर बलात्कार झालेला असून, १६ महिलांचे खून झालेले आहेत. लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कळमसरे व दोंडाईचा येथील प्रकरण ताजे आहे.महिलांना आरक्षण, सर्व क्षेत्रात महिलांना प्राधान्य, मुलगी शिकली प्रगती झाली, ‘यशस्वी पुरुषामागे स्त्री’ अशा गोड शब्दांची रोज उधळण होत असली तरी, समाजात महिलांची होणारी हेळसांड थांबलेली नाही. उलट महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. कार्यालय, शाळा-महाविद्यालय, बस-रेल्वे प्रवास आणि इतर ठिकाणीही महिलांना कोणत्या ना कोणत्या घटनेला रोज सामोरे जावे लागते.या गुन्ह्यांची नोंदही पोलीस ठाण्यात केली जाते. पुढे प्रकरण न्यायालयात जाते. मात्र तिथूनही प्रकरणे लवकर पुढे सरकत नाहीत. साहजिकच इथेही या महिलांची हेळसांड होते.बालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकराष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या नोंदणीनुसार २०१३ मध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहेत. बालगुन्हेगारांकडून हे अत्याचार करण्याचे प्रमाण १३२ टक्क्यांनी वाढले आहे.१६ ते १८ वयोगटातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. २००२ मध्ये हे प्रमाण ४८.७ टक्के होते. ते २०१३ मध्ये ६६.३ टक्के झाले आहे.देशात महाराष्टÑ आघाडीवरमहिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी सुमारे १३ हजार ८२७ तक्रारींची नोंद झाली. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये १३ हजार ३२३ आणि आंध्र प्रदेशात १३ हजार २६७ तक्रारी दाखल झाल्या. देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणारअत्याचार झालेल्या महिलांना मदत मिळण्यासाठी वन स्टॉप सेंटर उघडण्यात येणार आहे. देशातील ६६० ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र उघडले जाईल. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या केंद्र्रात वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्यता, कायदेशीर सल्ला, मानस-सामाजिक सल्ला आणि तात्पुरता निवारा आदी बाबी असणार आहेत. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव