शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:52 IST

माय ओपिनीयन

स्वतंत्र भारतात विविध आर्थिक, सामाजिक स्तरावर जगणाऱ्या अठरापगड जाती जमातींना कधीतरी समतेच्या एका पातळीवर आणू या उद्देशाने राखीव जागा हा उपाय केला आहे. पण जातीय अहंकार आणि धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देईल का ? हा प्रश्न डॉ. पायल तडवीच्या मृत्यूने ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी असताना आम्ही ‘एकलव्योंके अंगुठे कब तक कटते रहेंगे’ नावाचे प्रदर्शन तयार करून शिक्षण व्यवस्थेपासून उपेक्षित राहिलेल्या घटकांची समस्या मांडत होतो. आज डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येमुळे त्याची आठवण झाली. तडवी हा आदिवासी समाज जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल परिसरात आहे. या व्यतिरिक्त फारसा कुठे नाही. आदिवासींसाठी प्रयत्न पूर्वक केलेल्या शैक्षणिक सुविधांचा परिणाम म्हणजे त्यांच्यातील साधारणपणे दुसºया पिढीने उच्च शिक्षणात पाय रोवला आहे. डॉ. पायलचे आई वडील हे पदवीधर होऊन जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत. सुशिक्षित कुटुंबातील पायल बारावी पासून सलगपणे चांगले गुण मिळवून वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस झाली आणि पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिने प्रवेश मिळवला. पण आदिवासी भिल्ल तडवी सारख्या अति मागास जमातीतून आलेली मुलगी तिच्या सहपाठींच्या मनात खुपत होती. समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा व्यवसाय, त्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ ही जास्त पसंती असलेली शाखा. त्या शाखेची एमडी होणारी डॉ पायल. तिच्यासोबत शिकणाºया तीन वरिष्ठ (सिनियर) डॉक्टर महिलांनी तिचे मनोधैर्य, एकाग्रता भंग करण्यासाठी मानसिक छळ केला. तिला अधिक सराव, कौशल्य मिळू नये यासाठी पक्षपात करणे, तुच्छ लेखणे, वरिष्ठांकडे तक्रारींच्या धमक्या देणे अशा अनेक प्रकारे रॅगिंग करून विद्यार्थी म्हणून जगणे कठीण केले. अखेर २२ मे रोजी तिने आपले आयुष्य संपविले. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली ही शंका पालकांच्या मनात आहे. प्रमुख आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल फरार आहेत. नायर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची निष्क्रियता न्यायाचे आश्वासन देत नाहीये. त्यामुळे जातीय अहंकार आणि धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देतील का, अजून किती एकलव्यांचा तेजोभंग ही व्यवस्था करणार आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.- वासंती दिघे, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव