शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

व्यापारी संकूल सुरू न झाल्यास न्यायालयात जाणार - खासदार उन्मेष पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:34 IST

संकुले सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक-१मध्ये केंद्र सरकारने व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे, असा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. आता ही व्यापारी संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ इशारादेखील त्यांनी दिला आहे.शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यापाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या ३० मे रोजीच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणची व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिला. राज्यातील अनेक शहरांमधील ८० टक्के व्यापार संकुलांमध्ये आहे. यात जळगाव शहराचीही अशीच स्थिती आहे. येथील संकुलांमधील व्यापार बंद असल्याने ५० हजार नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.कोरोनाशी लढताना आर्थिक लढाईदेखील महत्त्वाची असल्याने शहरातील व्यापारी संकुले सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. त्यामुळे ३० जूननंतर संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे व्यापाºयांवर ही वेळकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ९० दिवस व्यापार बंद ठेवला. त्या वेळी योग्य उपाययोजना झाल्या नाही व राज्य सरकारच्या या गलथान कारभारामुळेच रुग्णांची संख्या वाढली व व्यापाºयांवर आता व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली, असा आरोपही खासदार पाटील यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव