शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

व्यापारी संकूल सुरू न झाल्यास न्यायालयात जाणार - खासदार उन्मेष पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:34 IST

संकुले सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक-१मध्ये केंद्र सरकारने व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे, असा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. आता ही व्यापारी संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ इशारादेखील त्यांनी दिला आहे.शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यापाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या ३० मे रोजीच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणची व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिला. राज्यातील अनेक शहरांमधील ८० टक्के व्यापार संकुलांमध्ये आहे. यात जळगाव शहराचीही अशीच स्थिती आहे. येथील संकुलांमधील व्यापार बंद असल्याने ५० हजार नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.कोरोनाशी लढताना आर्थिक लढाईदेखील महत्त्वाची असल्याने शहरातील व्यापारी संकुले सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. त्यामुळे ३० जूननंतर संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे व्यापाºयांवर ही वेळकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ९० दिवस व्यापार बंद ठेवला. त्या वेळी योग्य उपाययोजना झाल्या नाही व राज्य सरकारच्या या गलथान कारभारामुळेच रुग्णांची संख्या वाढली व व्यापाºयांवर आता व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली, असा आरोपही खासदार पाटील यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव