शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:48 IST

रुग्णालयातील दुर्दैवी घटनांनी कर्मचाऱ्यांचे खचलेले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

आनंद सुरवाडेजळगाव : कोविडच्या तीन महिन्यात रुग्णालयाचे मनुष्यबळ थकलेले आहे, दुर्दैवी घटनांनी त्यांचे मनोबलही खचले आहे़ त्यांचे मनोबल वाढवून, सर्वांच्या समन्वयातून मृत्यूदर घटविणे व या रुग्णालयाविषयी सामान्यांमध्ये नव्याने एक विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे़ हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलणार आहोत, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला़प्रश ्न: राज्याचे सर्व लक्ष जळगाववर असताना शिवाय आधीचे अधिष्ठाता निलंबित झाल्यानंतर तुम्ही पदभार स्वीकारला याकडे कसे बघता?उत्तर : याकडे एक आव्हान म्हणून बघतो़ साध्या पिचवर कुणीही बॅटींग करू शकते़ आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे त्याची पूर्ण कसोटी लागणार हे निश्चित मात्र, या कसोटीवर खरा उतरण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे़ सध्या मृत्यूदर घटविणे व रुग्णालयाची प्रतिमा उंचावून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही आव्हाने प्रामुख्याने आहेत़प्रश ्न:रुग्णालयात काय उणिवा जाणवल्या.. त्या दूर करण्यासाठी काय नियोजन आहे?उत्तर : वैद्यकीय अधीक्षक निलंबित झाल्यामुळे मी सर्व माहिती घेऊन एक सक्षम अधिकारी म्हणून डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांची नेमणूक केली़ औषधवैद्यक शास्त्राबाबत डॉ़ विजय गायकवाड यांच्याकडे जबाबदारी सोपावली़मनुष्यबळाचे नियोजन केल्यानंतर इंफ्रास्टकचरवर काम केले़ आॅक्सिजनचे काम करणाºया डॉक्टरांना केवळ साठा नव्हे तर सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून माहिती देण्याच्या सूचना दिल्या़ सेंट्रल आॅक्सिजनच्या पाईपलाईनच्या कामाला गती दिली़ १५० बेडचे काम पूर्ण झाले आहे़ काहींचे लवकरच होईल, उपसंचालक ठाणे यांच्याकडून २०० जम्बो सिलींडर मागविले असून शंभर आलेले आहेत़ यासह लवकरच १९ व्हँटीलेटर येणार आहेत़ मॉनीटर्स आले़प्रश ्न:अनेक डॉक्टर पगार घेऊन सेवा देत नसल्याचे आरोप वारंवार होत आहेत़उत्तर :जे डॉक्टर कामाला नाहीत त्यांना सर्वांना कामाला लावले आहेत़ नियमावलीनुसार सर्वांच्या ड्युट्या लावल्या आहेत़ जे कामावर नसतील त्यांचे पगार काढल्यास कारवाई करेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे़ याठिकाणी किती कर्मचारी आहेत कोणाकडेच याद्या नाहीत, त्या याद्या मागविल्या असून सर्वांशी बोलणार आहे़सर्वाच्या सुट्या रद्दसुट्या कोणाला मिळणार नाहीत. मुंबईहून १४ डॉक्टर्स आले असून २८ परिचारिका आल्या आहेत. बाहेरून आलेले डॉक्टर्स अनुभवी आहेत, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांच्या ड्युटी अतिदक्षता विभागात लावलेल्या आहेत़रुग्णाला आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर सुरळीत होणे अत्यावश्यक असते़ मात्र, रुग्ण संख्याच वाढणार नाही, याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे़ रुग्ण वाढले नाहीत तर मृत्यू होणार नाही, यात नागरिकांनी लवकर रुग्णालयात येणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे़गंभीर व आवश्यकता असल्यास सर्व सुविधा रुग्णांना जागेवरच देण्याचा प्रयत्न आहे़ त्यामुळे आगामी अप्रिय घटना टाळता येतील़- डॉ. रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Jalgaonजळगाव