शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:48 IST

रुग्णालयातील दुर्दैवी घटनांनी कर्मचाऱ्यांचे खचलेले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

आनंद सुरवाडेजळगाव : कोविडच्या तीन महिन्यात रुग्णालयाचे मनुष्यबळ थकलेले आहे, दुर्दैवी घटनांनी त्यांचे मनोबलही खचले आहे़ त्यांचे मनोबल वाढवून, सर्वांच्या समन्वयातून मृत्यूदर घटविणे व या रुग्णालयाविषयी सामान्यांमध्ये नव्याने एक विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे़ हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलणार आहोत, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला़प्रश ्न: राज्याचे सर्व लक्ष जळगाववर असताना शिवाय आधीचे अधिष्ठाता निलंबित झाल्यानंतर तुम्ही पदभार स्वीकारला याकडे कसे बघता?उत्तर : याकडे एक आव्हान म्हणून बघतो़ साध्या पिचवर कुणीही बॅटींग करू शकते़ आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे त्याची पूर्ण कसोटी लागणार हे निश्चित मात्र, या कसोटीवर खरा उतरण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे़ सध्या मृत्यूदर घटविणे व रुग्णालयाची प्रतिमा उंचावून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही आव्हाने प्रामुख्याने आहेत़प्रश ्न:रुग्णालयात काय उणिवा जाणवल्या.. त्या दूर करण्यासाठी काय नियोजन आहे?उत्तर : वैद्यकीय अधीक्षक निलंबित झाल्यामुळे मी सर्व माहिती घेऊन एक सक्षम अधिकारी म्हणून डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांची नेमणूक केली़ औषधवैद्यक शास्त्राबाबत डॉ़ विजय गायकवाड यांच्याकडे जबाबदारी सोपावली़मनुष्यबळाचे नियोजन केल्यानंतर इंफ्रास्टकचरवर काम केले़ आॅक्सिजनचे काम करणाºया डॉक्टरांना केवळ साठा नव्हे तर सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून माहिती देण्याच्या सूचना दिल्या़ सेंट्रल आॅक्सिजनच्या पाईपलाईनच्या कामाला गती दिली़ १५० बेडचे काम पूर्ण झाले आहे़ काहींचे लवकरच होईल, उपसंचालक ठाणे यांच्याकडून २०० जम्बो सिलींडर मागविले असून शंभर आलेले आहेत़ यासह लवकरच १९ व्हँटीलेटर येणार आहेत़ मॉनीटर्स आले़प्रश ्न:अनेक डॉक्टर पगार घेऊन सेवा देत नसल्याचे आरोप वारंवार होत आहेत़उत्तर :जे डॉक्टर कामाला नाहीत त्यांना सर्वांना कामाला लावले आहेत़ नियमावलीनुसार सर्वांच्या ड्युट्या लावल्या आहेत़ जे कामावर नसतील त्यांचे पगार काढल्यास कारवाई करेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे़ याठिकाणी किती कर्मचारी आहेत कोणाकडेच याद्या नाहीत, त्या याद्या मागविल्या असून सर्वांशी बोलणार आहे़सर्वाच्या सुट्या रद्दसुट्या कोणाला मिळणार नाहीत. मुंबईहून १४ डॉक्टर्स आले असून २८ परिचारिका आल्या आहेत. बाहेरून आलेले डॉक्टर्स अनुभवी आहेत, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांच्या ड्युटी अतिदक्षता विभागात लावलेल्या आहेत़रुग्णाला आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर सुरळीत होणे अत्यावश्यक असते़ मात्र, रुग्ण संख्याच वाढणार नाही, याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे़ रुग्ण वाढले नाहीत तर मृत्यू होणार नाही, यात नागरिकांनी लवकर रुग्णालयात येणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे़गंभीर व आवश्यकता असल्यास सर्व सुविधा रुग्णांना जागेवरच देण्याचा प्रयत्न आहे़ त्यामुळे आगामी अप्रिय घटना टाळता येतील़- डॉ. रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Jalgaonजळगाव