शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:03 IST

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते

चंद्रशेखर जोशीराजकीय पक्षांमध्ये पडझड, इकडून तिकडे जाणे हे सुरूच असते. मात्र एखाद्या पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते. जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत नेमके असेच होत असल्याचे लक्षात येते. महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी अनेक दावे केले होते. मात्र ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. वास्तविक त्यावेळी हा पक्ष सत्तेत होता. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. एकेकाळी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, स्व. मधुकराव चौधरी, स्व. जे.टी. महाजन, स्व. के.एम. पाटील यांच्या सारख्या दिग्गज मंडळींना पक्षाने विविध पदांवर संधी दिली. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यावेळी पक्षासाठी मोठे योगदान देऊन पक्ष वाढविला, मतदार संघ राखले. आज मात्र ते वैभव गायब झाल्याचीच प्रचिती येत आहे. नुकत्याच काही पालिका व जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. जामनेर पालिका, मुक्ताईनगर पालिका व त्यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या तिनही ठिकाणी कॉँग्रेसचे पानिपत झाले. एकाही जागेवर या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन गट, तट विसरा पक्ष वाढवा असा उपदेश केला. पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले विनायक देशमुख यांनीही अखेर हात टेकले व जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नको रे बाबा...अशी भूमिका घेतली. असे असताना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा राहील अशी आशा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आजही आहे. त्यांनी ही आशा शहरातील बुद्धीजिवींशी संवाद साधताना व्यक्तही केली. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ त्यांनी जळगाव जिल्ह्यातून केला. जनसंघर्षाची ‘ज्योत’ त्यांनी या जिल्ह्यातून प्रज्वालीत केली. आता जबाबदारी या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे. आजही या पक्षात गट-तट हे आहेच हे नाकारून चालणार नाही. त्यातूनच मोठी मर्गल निर्माण झाली आहे. पेटविलेल्या ज्योतीचा वणवा केला नाही तर... पूर्वी होती तीच स्थिती पक्षाची राहील.

 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव