शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:03 IST

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते

चंद्रशेखर जोशीराजकीय पक्षांमध्ये पडझड, इकडून तिकडे जाणे हे सुरूच असते. मात्र एखाद्या पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते. जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत नेमके असेच होत असल्याचे लक्षात येते. महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी अनेक दावे केले होते. मात्र ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. वास्तविक त्यावेळी हा पक्ष सत्तेत होता. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. एकेकाळी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, स्व. मधुकराव चौधरी, स्व. जे.टी. महाजन, स्व. के.एम. पाटील यांच्या सारख्या दिग्गज मंडळींना पक्षाने विविध पदांवर संधी दिली. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यावेळी पक्षासाठी मोठे योगदान देऊन पक्ष वाढविला, मतदार संघ राखले. आज मात्र ते वैभव गायब झाल्याचीच प्रचिती येत आहे. नुकत्याच काही पालिका व जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. जामनेर पालिका, मुक्ताईनगर पालिका व त्यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या तिनही ठिकाणी कॉँग्रेसचे पानिपत झाले. एकाही जागेवर या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन गट, तट विसरा पक्ष वाढवा असा उपदेश केला. पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले विनायक देशमुख यांनीही अखेर हात टेकले व जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नको रे बाबा...अशी भूमिका घेतली. असे असताना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा राहील अशी आशा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आजही आहे. त्यांनी ही आशा शहरातील बुद्धीजिवींशी संवाद साधताना व्यक्तही केली. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ त्यांनी जळगाव जिल्ह्यातून केला. जनसंघर्षाची ‘ज्योत’ त्यांनी या जिल्ह्यातून प्रज्वालीत केली. आता जबाबदारी या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे. आजही या पक्षात गट-तट हे आहेच हे नाकारून चालणार नाही. त्यातूनच मोठी मर्गल निर्माण झाली आहे. पेटविलेल्या ज्योतीचा वणवा केला नाही तर... पूर्वी होती तीच स्थिती पक्षाची राहील.

 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव