शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:03 IST

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते

चंद्रशेखर जोशीराजकीय पक्षांमध्ये पडझड, इकडून तिकडे जाणे हे सुरूच असते. मात्र एखाद्या पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते. जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत नेमके असेच होत असल्याचे लक्षात येते. महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी अनेक दावे केले होते. मात्र ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. वास्तविक त्यावेळी हा पक्ष सत्तेत होता. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. एकेकाळी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, स्व. मधुकराव चौधरी, स्व. जे.टी. महाजन, स्व. के.एम. पाटील यांच्या सारख्या दिग्गज मंडळींना पक्षाने विविध पदांवर संधी दिली. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यावेळी पक्षासाठी मोठे योगदान देऊन पक्ष वाढविला, मतदार संघ राखले. आज मात्र ते वैभव गायब झाल्याचीच प्रचिती येत आहे. नुकत्याच काही पालिका व जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. जामनेर पालिका, मुक्ताईनगर पालिका व त्यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या तिनही ठिकाणी कॉँग्रेसचे पानिपत झाले. एकाही जागेवर या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन गट, तट विसरा पक्ष वाढवा असा उपदेश केला. पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले विनायक देशमुख यांनीही अखेर हात टेकले व जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नको रे बाबा...अशी भूमिका घेतली. असे असताना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा राहील अशी आशा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आजही आहे. त्यांनी ही आशा शहरातील बुद्धीजिवींशी संवाद साधताना व्यक्तही केली. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ त्यांनी जळगाव जिल्ह्यातून केला. जनसंघर्षाची ‘ज्योत’ त्यांनी या जिल्ह्यातून प्रज्वालीत केली. आता जबाबदारी या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे. आजही या पक्षात गट-तट हे आहेच हे नाकारून चालणार नाही. त्यातूनच मोठी मर्गल निर्माण झाली आहे. पेटविलेल्या ज्योतीचा वणवा केला नाही तर... पूर्वी होती तीच स्थिती पक्षाची राहील.

 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव