शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पालकमंत्री असताना एकनाथ खडसे गप्प का होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST

जळगाव : बीएचआर प्रकरणात दोषी तसेच कवडीमोल दरात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ...

जळगाव : बीएचआर प्रकरणात दोषी तसेच कवडीमोल दरात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आता पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री असताना खडसे तेव्हा गप्प का होते? तेव्हाच तत्परता दाखवली असती तर कंडारेची इतकी हिंमत झाली नसती व आज इतका घोटाळाच झाला नसता त्यामुळे या घोटाळ्याला अवसायक म्हणून जितके कंडारे जबाबदार आहे, तितकेच खडसे व तेव्हाचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील जबाबदार असल्याचा आरोप जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या नियुक्तीसाठी पालकमंत्री म्हणून एकनाथ खडसे, तत्कालीन सहकार मंत्री यांनीच शिफारस केली होती, पालकमंत्री असताना खडसेंकडे ठेवीदार जायचे तेव्हा, मला विचारुन ठेवी ठेवल्यात का? असे उत्तर खडसेंकडून मिळत होते. हे उत्तर ऐकून ठेवीदारांच्या मनावर काय बेतले असेल. खडसे आज फक्त राजकारणासाठीच बोलत असल्याचा आरोप केला. बीएचआरमधील महसूली संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी कंडारेने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता, तेव्हाही खडसेच पालकमंत्री होते. या घोटाळ्याला तेव्हापासूनचे तर आतापर्यंतचे सर्वच पालकमंत्री जबाबदार आहेत. त्याशिवाय खडसे यांनी या प्रकरणात बडे नेते अडकतील असे म्हटले आहे, तसे म्हणण्यापेक्षा थेट नावे घेऊन बोलावे असेही पाटील म्हणाले. यात खरच तळमळ असेल तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दाखवावे, तरच हे प्रकरण हाती घेतल्याचे सार्थक होईल, अन्यथा हे सुडाचे राजकारणच ठरेल. खडसेंनी या प्रकरणात ॲड.विजय पाटील यांच्याप्रमाणे त्रयस्त तक्रारदार व्हावे असे पाटील म्हणाले.

सहकारात पैसा मिळण्याची तरतूदच नाही

सहकार कायद्यात पतसंस्थांमध्ये अपहार, किंवा फसवणूक झाली असेल तर त्यातून पैसे परत मिळण्याची कायद्यात तरतूदच नाही. दिवाणी प्रकरणातून फौजदारी प्रकरण झाले तर गुन्हे दाखल होऊन दोषींना शिक्षा होते, मात्र पैसा परत मिळत नाही. त्यामुळे कायद्यात बदल करुन गुंतवणूकदार,ठेवीदारांना पैसे मिळतील अशी तरतूद करावी.

गुलाबराव पाटील रेतीमातीचे धंदे हाताळण्यासाठीच?

अवसायक कंडारे हा सहकार खात्यातील अधिकारी होता. खडसेनंतर गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री होते, तरीही कंडारेने हे पराक्रम केलेत. मग सहकार राज्यमंत्री काय कामाचे? फक्त रेतीमातीचेच धंदे त्यांनी हाताळायचे का? असा सवालही शिवराम पाटील यांनी विचारला आहे. गेल्या दहा वर्षात शहराचे रस्ते स्मशान बनलेत, याकडे कोणी लक्ष दिले नाही. जिल्ह्यातील वाळूच्या धंद्यात मक्तेदारांसोबत तहसीलदार करीत आहेत. गौण खनिज परमीटच्या बोगस पावत्या वापरुन शासनाचा महसूल बुडवला जात आहे. जिल्हा परिषदेत ५० निधी कागदावर परस्पर अपहार केला जात आहे. कापूस मोजणीत आठ टक्के कटोती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची टीका शिवराम पाटील यांनी केली.

पाईंटर

विलास जाधवर यांच्यासाठी खासदार रक्षा खडसेंची शिफारस

एकनाथ खडसे यांनी बीएचआर प्रकरणात त्रयस्त तक्रारदार व्हावे

शरद पवारांकडून खडसेंचा खंजीर म्हणून वापर

प्रमोद रायसोनीला प्रथमच अटक झाली तेव्हा खडसेंची भूमिका काय होती?

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना काय परिणाम भोगावे लागले

सुनील झंवर याला शालेय पोषण आहारात जबाबदार धरले तेव्हा जि.प.चे सीईओ आस्तिककुमार पांडे खडसेंच्या मांडीला मांडी लावून बसायचे