शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आरक्षणावरून संघर्ष कशासाठी, वेगवेगळी वक्तव्ये करणे टाळा - दीपक केसरकर 

By अमित महाबळ | Updated: November 19, 2023 12:06 IST

आरक्षण नुसते देऊन चालणार नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकावे लागेल आणि ते टिकेल याची खात्री आहे, असेही केसरकर म्हणाले.

जळगाव - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर वेगवेगळी वक्तव्य करण्यापासून सर्वांनीच अलिप्त राहायला पाहिजे. सरकार म्हणतेय ओबीसी व मराठा समाज या दोघांच्या मागण्या मान्य आहेत, तर मग आपापसात संघर्ष कशासाठी, असा थेट मुद्दा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मांडला आहे. ते रविवारी, सकाळी जळगावच्या शासकीय विश्रामृहात माध्यमांशी बोलत होते.      

मराठा व ओबीसी समाजाचे नेते आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यावरील प्रश्नावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, की सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. आपणच ते बळकट केले पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने गेला तरच अनेक खासगी नोकऱ्या तयार होणार आहेत पण महाराष्ट्र असंतुष्ट राहिला, दंगली झाल्या तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असते, खासगी नोकऱ्या ९० टक्के असतात. उद्योग वाढविले, तरच खासगी नोकऱ्या येतील, युवकांना रोजगार मिळेल. त्यासाठी शांतता नांदणे महत्वाची आहे.

आरक्षण देणे सरकारची जबाबदारी...आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजाने सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे. मराठा समाज मागासलेला आहे हे कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा करावा लागणार आहे. आंदोलन होऊन गेले, मागणी मान्य झाली. पूर्वीही मान्य होती. आता समाजाची बाजू व्यवस्थित बळकट करून टिकणारे आरक्षण देणे ही काळाजी गरज आहे. हे करत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार कुठलाही धक्का लागू देणार नाही. ही शासनाची भूमिका आहे. 

इम्पिरिकल डाटा, हातात हात घालून काम करा...सुप्रीम कोर्टाने क्युरिटीव्ह पिटिशन ऐकण्याची तयारी दाखवली आहे. मराठा समाजाचे आरक्षण नाकारताना कोर्टाने जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावर योग्य स्पष्टीकरण मांडावे लागणार आहे. त्यासाठी इम्पिरिकल डाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ सरकारवर जबाबदारी न टाकता मराठा समाज व सरकार यांनी हातात हात घालून हे आरक्षण टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासन पूर्ण प्रयत्न करत आहे. आरक्षण नुसते देऊन चालणार नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकावे लागेल आणि ते टिकेल याची खात्री आहे, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maratha Reservationमराठा आरक्षण