शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

जिल्हाधिकाऱ्यांचा आनंदोत्सव कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 6:35 PM

विश्लेषण

 सुशील देवकरज़ळगाव- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. समितीने केलेला जल्लोष एकवेळ समजू शकतो, मात्र जिल्हाधिकाºयांनीही ढोलताशांच्या गजरात जल्लोषात सामील होणे थोडे आश्चर्यकारक आहे. एकीकडे या महामार्गावर शेकडो लोकांचे बळी जात असतानाही प्रशासन म्हणून काहीही करू न शकलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांचा हा आनंदोत्सव नक्की कशासाठी ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.‘नही’तर्फे शहराबाहेरून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले असले तरीही ते अद्यापही व्यवस्थितपणे सुरू होऊ शकलेले नाही, अशी स्थिती आहे. तर शहरातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आधीच १०० कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण अथवा मजबुतीकरण ही प्रक्रिया ‘नही’कडून अशीही करण्यातच येणार होती. मात्र मागणी समांतर रस्त्यांची होती. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाची निविदा निघाल्याने जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांनी रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात नाचणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होणे कितपत संयुक्तिक आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.अभी दिल्ली दूरशहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरचा घोळ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. असे असताना सध्या केवळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अजून निविदा प्राप्त होणे, त्यांना मंजुरी, त्यांनी काम वेळेवर सुरू करणे, आणि त्यानंतर काम दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आदी अनेक बाबी आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू होईल. सुरू होईलच? याची खात्रीही देणे अवघड आहे. त्यामुळे केवळ चौपदरीकरणाची निविदा निघाली म्हणून कुणाला विजय मिळाल्याचा आनंद असेल तर तो साजरा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाने त्यात सहभागी होणे ही बाब खटकणारी आहे. एरव्ही हजारोंचा मोर्चा आला, रास्ता रोको आंदोलन झाले तरीही स्वत:च्या गेटवर देखील निवेदन घेण्यासाठी न येणाºया जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी समांतर रस्ते कृती समितीच्या अजिंठा चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी थेट अजिंठा चौफुली गाठून लेखी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे ‘नही’चे अधिकारीही सोबत नेण्याची काळजी घेतली होती. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, हा भाग वेगळा. मात्र त्यावेळीही जिल्हाधिकाºयांच्या हजेरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती या आनंदोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे.