शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:56 IST

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी ...

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी असतात, दीनवाणी हसतात आणि केविलवाणी दिसतात.पण म्हणजे ती खरोखरीच तशी असतात असं नाही. सुप्रसिद्ध देवस्थानीच्या भिकाऱ्याला, बॅँकेत लाखो रुपये जमा असूनही भीक मागण्याचा धंदा चालवण्यासाठी जसे, केविलवाणे, बापुडवाणे, भणंग, दरिद्री रूप धारण करावे लागते, तशी ही माणसं आतून अहंकार, महत्त्वाकांक्षी वगैरेच असतात. कोणी सहानुभूती दाखवत त्यांना म्हटलं की ‘अप्पासाहेब, खरंच तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला फारच कमी मिळालंय. जे मिळालंय ते अगदी न मिळाल्यासारखं, नगण्य आहे.!’ की अंतरी सुखावत अप्पाजी म्हणणार, ‘माझ्या लायकीनुसार माझ्या पदरात माप घाला, अशी भीक मागत मी कोणापुढे पदर पसरणाºयांतला नाही. तुमच्यासारख्या गुणग्राहक स्रेह्याला माझी कदर आहे हेच खूप झालं.’ खरेतर अप्पाजी आतून सुखावलेले असतात आणि तो सद्गृहस्थही मनातल्या मनात हसत असतो. कारण अप्पाजींनी मागल्या दाराने किती सत्ताधिशांपुढे डोळ्यात पाणी आणून आणून पदर पसरलेले आहेत, हे त्याला चांगले माहीत असते. एखाद्याला भस्म्यारोग झालेला असला की त्याला कितीही खाऊ घातलं तरी आणखी हवं असतं. तसं अशा व्यक्तीची स्वकौतुकाची भूक कधीच भागत नाही आणि म्हणून आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्याला काहीच मिळालेलं नाही, ही खंत बाळगत ते आयुष्यभर ‘खपाटपोटी’ जगतात.अतृप्त आत्म्यांचे म्हणतात, मेल्यावर भूत होते,ह्या अतृप्तांचे भूत, जिवंतपणीच झालेले असते.लायकीपेक्षा ह्यांना जास्तच मिळालेले असते,त्यांच्या लेखी मात्र ते खूप्पच कमी असते.असे अतृप्त, जीवनाची माती करून घेतात,जीवन म्हणजे सरणापुढचे क्रंदन करून घेतात.(पूर्वार्ध)- प्रा. अनिल सोनार

टॅग्स :Jalgaonजळगाव