शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:56 IST

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी ...

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी असतात, दीनवाणी हसतात आणि केविलवाणी दिसतात.पण म्हणजे ती खरोखरीच तशी असतात असं नाही. सुप्रसिद्ध देवस्थानीच्या भिकाऱ्याला, बॅँकेत लाखो रुपये जमा असूनही भीक मागण्याचा धंदा चालवण्यासाठी जसे, केविलवाणे, बापुडवाणे, भणंग, दरिद्री रूप धारण करावे लागते, तशी ही माणसं आतून अहंकार, महत्त्वाकांक्षी वगैरेच असतात. कोणी सहानुभूती दाखवत त्यांना म्हटलं की ‘अप्पासाहेब, खरंच तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला फारच कमी मिळालंय. जे मिळालंय ते अगदी न मिळाल्यासारखं, नगण्य आहे.!’ की अंतरी सुखावत अप्पाजी म्हणणार, ‘माझ्या लायकीनुसार माझ्या पदरात माप घाला, अशी भीक मागत मी कोणापुढे पदर पसरणाºयांतला नाही. तुमच्यासारख्या गुणग्राहक स्रेह्याला माझी कदर आहे हेच खूप झालं.’ खरेतर अप्पाजी आतून सुखावलेले असतात आणि तो सद्गृहस्थही मनातल्या मनात हसत असतो. कारण अप्पाजींनी मागल्या दाराने किती सत्ताधिशांपुढे डोळ्यात पाणी आणून आणून पदर पसरलेले आहेत, हे त्याला चांगले माहीत असते. एखाद्याला भस्म्यारोग झालेला असला की त्याला कितीही खाऊ घातलं तरी आणखी हवं असतं. तसं अशा व्यक्तीची स्वकौतुकाची भूक कधीच भागत नाही आणि म्हणून आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्याला काहीच मिळालेलं नाही, ही खंत बाळगत ते आयुष्यभर ‘खपाटपोटी’ जगतात.अतृप्त आत्म्यांचे म्हणतात, मेल्यावर भूत होते,ह्या अतृप्तांचे भूत, जिवंतपणीच झालेले असते.लायकीपेक्षा ह्यांना जास्तच मिळालेले असते,त्यांच्या लेखी मात्र ते खूप्पच कमी असते.असे अतृप्त, जीवनाची माती करून घेतात,जीवन म्हणजे सरणापुढचे क्रंदन करून घेतात.(पूर्वार्ध)- प्रा. अनिल सोनार

टॅग्स :Jalgaonजळगाव