शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

संसार उघड्यावर, पूरग्रस्तांची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. महाड तालुक्यातील तळीये गावाची स्थिती तर अतिशय भीषण होती. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. महाड तालुक्यासाठी शक्य तेव्हढी जास्तीत जास्त मदत पाठविण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.

कोकणातून ते शुक्रवारी जामनेरला परतले. पूरग्रस्तांना आधार हवा आहे, समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पोहचविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार महाजन प्रथम तळीये गावात पोहचले. नैसर्गिक आपत्तीनंतर कोकण सावरत असले तरी पुरामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. घरातील अन्न धान्य, पीठ आदी जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्याने त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहे. सुरुवातीला बाहेरून आचारी बोलावून त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली. तांदूळ, डाळ, गहू, सोबतच कपडे, चादरी आदी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या सुमारे १६ ट्रक महाडकडे रवाना केल्या आहे. १० हजार चटईचे तातडीने त्यांना वाटप केले.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरात व बाजारपेठेत १० ते १५ फूट पाणी शिरल्याने व्यापारी व सर्व सामान्य नागरिक संकटात सापडले आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे असे महाजन यांनी सांगितले.