शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

संसार उघड्यावर, पूरग्रस्तांची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. महाड तालुक्यातील तळीये गावाची स्थिती तर अतिशय भीषण होती. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. महाड तालुक्यासाठी शक्य तेव्हढी जास्तीत जास्त मदत पाठविण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.

कोकणातून ते शुक्रवारी जामनेरला परतले. पूरग्रस्तांना आधार हवा आहे, समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पोहचविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार महाजन प्रथम तळीये गावात पोहचले. नैसर्गिक आपत्तीनंतर कोकण सावरत असले तरी पुरामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. घरातील अन्न धान्य, पीठ आदी जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्याने त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहे. सुरुवातीला बाहेरून आचारी बोलावून त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली. तांदूळ, डाळ, गहू, सोबतच कपडे, चादरी आदी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या सुमारे १६ ट्रक महाडकडे रवाना केल्या आहे. १० हजार चटईचे तातडीने त्यांना वाटप केले.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरात व बाजारपेठेत १० ते १५ फूट पाणी शिरल्याने व्यापारी व सर्व सामान्य नागरिक संकटात सापडले आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे असे महाजन यांनी सांगितले.