शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संसार उघड्यावर, पूरग्रस्तांची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. महाड तालुक्यातील तळीये गावाची स्थिती तर अतिशय भीषण होती. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. महाड तालुक्यासाठी शक्य तेव्हढी जास्तीत जास्त मदत पाठविण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.

कोकणातून ते शुक्रवारी जामनेरला परतले. पूरग्रस्तांना आधार हवा आहे, समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पोहचविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार महाजन प्रथम तळीये गावात पोहचले. नैसर्गिक आपत्तीनंतर कोकण सावरत असले तरी पुरामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. घरातील अन्न धान्य, पीठ आदी जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्याने त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहे. सुरुवातीला बाहेरून आचारी बोलावून त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली. तांदूळ, डाळ, गहू, सोबतच कपडे, चादरी आदी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या सुमारे १६ ट्रक महाडकडे रवाना केल्या आहे. १० हजार चटईचे तातडीने त्यांना वाटप केले.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरात व बाजारपेठेत १० ते १५ फूट पाणी शिरल्याने व्यापारी व सर्व सामान्य नागरिक संकटात सापडले आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे असे महाजन यांनी सांगितले.