शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

संसार उघड्यावर, पूरग्रस्तांची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. महाड तालुक्यातील तळीये गावाची स्थिती तर अतिशय भीषण होती. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. महाड तालुक्यासाठी शक्य तेव्हढी जास्तीत जास्त मदत पाठविण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.

कोकणातून ते शुक्रवारी जामनेरला परतले. पूरग्रस्तांना आधार हवा आहे, समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पोहचविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार महाजन प्रथम तळीये गावात पोहचले. नैसर्गिक आपत्तीनंतर कोकण सावरत असले तरी पुरामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. घरातील अन्न धान्य, पीठ आदी जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्याने त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहे. सुरुवातीला बाहेरून आचारी बोलावून त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली. तांदूळ, डाळ, गहू, सोबतच कपडे, चादरी आदी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या सुमारे १६ ट्रक महाडकडे रवाना केल्या आहे. १० हजार चटईचे तातडीने त्यांना वाटप केले.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरात व बाजारपेठेत १० ते १५ फूट पाणी शिरल्याने व्यापारी व सर्व सामान्य नागरिक संकटात सापडले आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे असे महाजन यांनी सांगितले.